शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विद्युत उपकेंद्र निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:20 IST

उपविभागातील दुर्गम भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : अहेरी जिल्हा कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : उपविभागातील दुर्गम भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. उपविभागातील कमलापूर, जिमलगट्टा, अहेरी, भामरागड येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने ऊर्जामंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.अहेरी, कमलापूर, जिमलगट्टा परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा झालेला नाही. विद्युत पोहोचली असली तरी अनियमित वीज पुरवठा केला जातो. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठा असतो. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा या दुर्गम भागात मागणीपेक्षा अत्यल्प वीज पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे सातत्त्याने वीज पुरवठा खंडित होतो. सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी सर्वांनाच विजेच्या लपंडाचा फटका बसतो. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणेही नीट काम करीत नाही. अनेकदा उपकरणे निकामी होतात. त्यामुळे अहेरी, कमलापूर, जिमलगट्टा, भामरागड येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने केली आहे.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागसेन मेश्राम, छत्रपती गोवर्धन, योगेश आत्राम व पदाधिकारी उपस्थित होते.