शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मेंढात बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:35 IST

तालुक्यातील मेंढा येथे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र सदर बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. साध्या हातानेही सिमेंट व गिट्टी उकरून काढता येते. यावरून बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, याचा प्रत्यय येते.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील मेंढा येथे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र सदर बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. साध्या हातानेही सिमेंट व गिट्टी उकरून काढता येते. यावरून बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, याचा प्रत्यय येते. विशेष म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना ग्रामसेवक व सरपंच हे चुप्पी साधून आहेत. यावरून या बांधकामात या दोघांचाही वाटा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने सिंचन बंधारा मंजूर केला आहे. यासाठी जवळपास १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून बंधाऱ्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर बंधारा अतिशय निकृष्ट दर्जाचा बांधला जात आहे. बंधाºयाचा सध्याचा दर्जा लक्षात घेतला तर यावर पाचही लाख रुपये खर्च होतील की नाही, याबाबत शंका आहे. बंधाऱ्यासाठी नाल्यातीलच मातीमिश्रीत गिट्टी वापरली जात आहे. सिमेंटही वेगळ्याच कंपनीचे वापरले जात आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याने सर्वप्रथम बांधकामाची पाहणी केली. खाली टाकलेले बेडकाँक्रिट साध्या हातानेही उकरून निघत आहे. बांधकामाचा दर्जा एवढा निकृष्ट असल्याने हा बंधारा पावसाळ्यात टिकेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कामावर मेंढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची ट्रॅक्टर व इतर साहित्य वापरले जात आहेत. याचा अर्थ सदर काम उपसरपंचच करीत असावे. फक्त कागदोपत्री ग्रामपंचायत करीत असल्याचे दाखविले जात आहे.उपसरपंचाच्या ट्रॅक्टरने नाल्यातील रेतीचा उपसा करून या रेतीचा वापर बंधाऱ्यासाठी केला जात आहे. रेतीचा उपसा झाल्याने नाल्यामध्ये मोठा खड्डा पडला आहे. याच नाल्यामधून शेतकरी आपल्या शेतात जातात. खड्डा पडल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. हे सर्व निकृष्ट काम ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या मनमर्जीने सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून काम थांबविण्यात यावे, अन्यथा हे काम पुढे चालू राहिल्यास शासनाचे सुमारे १५ लाख रुपये वाया जाण्याची शक्यता आहे. तक्रार अर्जावर मेंढा येथील शेतकरी गजानन भुरले, तुळशिदास भैसारे, नीलेश धोडरे, नंदाजी भुरले, सुधीर भुरले, रमेश भुरले, मारोती चलाख यांनी केली आहे.ग्रामसेवक व उपसरपंचाची मिलीभगतसदर कामावर उपसरपंचाचे साहित्य वापरले जात आहेत. यावरून सदर काम उपसरपंचच करीत असल्याचे दिसूून येत आहे. यातील काही मलाई ग्रामसेवकालाही मिळणार असल्याने ग्रामसेवकही चुप्पी साधून आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही बांधकाम बंद न ठेवता पुढे रेटले जात आहे. विशेष म्हणजे या बांधकामासाठी चोरीची रेती वापरण्यात आली आहे. ज्या ट्रॅक्टरने रेतीची चोरी झाली आहे, त्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने नियमानुसार १ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावावा. तसेच जेवढ्या रेतीचा उपसा झाला आहे, तेवढ्या रेतीचे मोजमाप करून तेवढी रक्कम कंत्राटदाराकडून वसूल करावी. तसेच ज्या ठिकाणी खड्डा तयार झाला आहे, सदर खड्डा कंत्राटदारानेच बुजवून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मेंढा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक छगन खुणे यांना संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी संच बंद असल्याचा शाब्दिक संदेश येत होता.