शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

बीएसएनएलची सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:05 IST

केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे.

अधिकाºयांची टोलवाटोलवी : कुणाचा पायपोस कुणात नाहीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली शहरातील काही भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.सध्या प्रत्येक गोष्टीसाठी आॅनलाईन राहण्याचा सल्ला सरकार देत आहे. अनेक सेवा तर केवळ आॅनलाईनच उपलब्ध आहेत. मात्र इंटरनेट सुविधाच ठप्प पडल्यानंतर आॅनलाईन सेवेचा लाभ घ्यावा तरी कसा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. विशेष म्हणजे वारंवार ठप्प होणाºया इंटरनेट सेवेसाठी कोण जबाबदार आहे, नेमका कुठे तांत्रिक बिघाड आहे हेसुद्धा बीएसएनएलच्या अधिकाºयांना आणि कर्मचाºयांना सापडत नाही.जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे लँडलाईन टेलिफोन नंबर बंद पडलेले आहेत. यात अनेक सरकारी कार्यालयांसोबत पोलीस ठाण्यांचेही फोन बंद आहेत. पोलीस विभाग बीएसएनएलकडे एक वेळ तक्रार करून मोकळे होतात, पण नंतर तो दुरूस्त होईलपर्यंत कोणताही फॉलोअप घेतला जात नाही. त्यामुळे टेलिफोनच्या माध्यमातून नागरिकांचा पोलिसांशी संवाद सुलभ होण्याशी बीएसएनएल कंपनीलाच नाही तर पोलिसांनाही काही सोयरसुतक नाही की काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक विचारत आहेत.पोलीस कंट्रोल रुमचा नंबर अद्याप बंदचजिल्ह्यात कुठेही कोणाला पोलीस मदतीची गरज पडली किंवा एखादी महत्वपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी ‘१००’ हा क्रमांक डायल केला जातो. हा टेलिफोन नंबर पोलीस कंट्रोल रूममध्ये असतो. मात्र गडचिरोली पोलिसांच्या कंट्रोल रूममधील हा महत्वाचा फोन नंबर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यासंदर्भात पोलिसांकडे विचारणा केली असता बीएसएनएलकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी दुरूस्ती केली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून बीएसएनएलचा कारभार किती अनियंत्रित झाला याची कल्पना येते.