शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

ब्रिटिशकालीन विश्रामगृह दुरवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:29 IST

अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देवनविकास महामंडळाचे दुर्लक्ष : वेलगूर टोला येथे ९० वर्षांपूर्वी झाली निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कवेलगूर : अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.वेलगूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये इंग्रजांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. स्वातंत्र्यानंतर वन विकास महामंडळाकडे विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी आली. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या विश्रामगृहातील कवेलू, दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विश्रामगृहासभोवताल वृक्ष-वेली वाढल्या आहेत. फरशीही पूर्णता फुटलेली आहे. परिसरात कचरा उगवला आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून जपलेला वारसा नष्ट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वन विकास महामंडळाने या विश्रामगृहाची दुरूस्ती व रंगरंगोटी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.पर्यटनाला वाववेलगूर टोलापासून चार किमी अंतरावर जंगलात झिरकांबंडा नावाचे ठिकाण आहे. येथे मोठमोठ्यात दगडातून वर्षभर झरे वाहत असतात. त्यामुळे या स्थळाचा विकास केल्यास पर्यटनाला वाव मिळेल. तसेच ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची दुरूस्ती झाल्यास बाहेरील पर्यटकांसाठी ही आकर्षणाचे स्थळ निर्माण होईल, पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगारही मिळेल.