शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

निधीअभावी पुलाचे काम रखडले

By admin | Updated: May 24, 2015 02:06 IST

कमी उंचीच्या पुलामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होते.

अहेरी : कमी उंचीच्या पुलामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. मात्र राज्य शासनाने निधी न दिल्यामुळे कमी उंचीच्या पुलाचे बांधकाम रखडले असल्याची माहिती आहे. परिणामी आगामी पावसाळ्यात पुन्हा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. अहेरी उपविभागात पर्लकोटा, प्राणहिता नदीवर कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. गडअहेरी तसेच बांडीया नदीवरही कमी उंचीचे पूल असल्याने जनजीवन विस्कळीत होते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने भामरागड भागातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. प्राणहिता नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र याकडेही राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. कमी उंचीच्या पुलामुळे या भागातील १०० हून अधिक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. बांडीया नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने जारावंडी भागातील नागरिकांना जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही समस्यांचा सामना करावा लागत आहे. अहेरीचे तत्कालीन आमदार दीपक आत्राम व तत्कालीन आंध्रप्रदेशचे आमदार कोनप्पा यांनी प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामाचे वांगेपल्ली येथे भूमीपूजन केले होते. दरम्यानच्या काळात पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रूपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे मागील पाच वर्षभरात या पुलाचे काहीही काम झाले नाही. त्यामुळे पूल निर्मितीचा प्रश्न कायमच आहे. कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)पालमंत्र्यांकडूनही भ्रमनिरासआदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व तेलंगणाचे आमदार कोनप्पा यांनी संयुक्तरित्या काही दिवसापूर्वी प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावित स्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी या भागातील जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पालकमंत्री आत्राम यांच्याकडून या पुलाच्या बांधकाम होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जनतेचा पुन्हा भ्रमनिरास झाला. बांधकामाअभावी यंदाच्या पावसाळ्यात या भागातील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागणार आहे.