शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मार्कंडादेव येथील पूल अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:45 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते.

ठळक मुद्दे४७ वर्ष उलटले : यात्रेदरम्यान भाविकांना कसरत करून गाठावे लागते मंदिर

संतोष सुरपाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते. कच्च्या स्वरूपाच्या रपट्यावरून भाविकांना यात्राकाळात धोकादायक प्रवास करावा लागतो. मात्र या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.मार्कंडादेव, साखरी घाटाला जोडण्यासाठी ४७ वर्षांपूर्वी मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रात छोट्या पुलाच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. मात्र नदीपात्रात पुलाचे अर्धवटच काम करण्यात आले. गेल्या दशकापासूनच हा पूल अर्धवट स्थितीत आहे. मार्कंडादेव येथे होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.तिर्थस्थळ असलेला मार्कंडादेव येथे गेल्या काही वर्षांपासून प्रशासनातील मोठे अधिकारी व मंत्री महोदय तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येतात . मात्र यापैकी एकानेही सदर पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. यासंदर्भात मार्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.दरवर्षी तयार होतो रपटाचंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना थेट मार्कंडादेव येथे येणे सोयीचे व्हावे, यासाठी वैनगंगा नदीपात्रात यात्राकाळात तात्पुरत्या स्वरूपाचा रपटा तयार केला जातो. मात्र हा रपटा पाण्याच्या प्रवाहाने वाहून जातो. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला दरवर्षी रपटा तयार करावा लागतो. अर्धवट पुलाचे काम पूर्ण केल्यास रपट्यावरील खर्च वाचू शकतो.