शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुलामुळे ३० वर्षांची अडचण दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:29 IST

वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात निर्माण होणारी अडचण या पुलामुळे दूर झाली आहे.

ठळक मुद्देवैरागडलगतची वैलोचना नदी : पावसाळ्यात होत असे २० गावांची वाहतूक प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात निर्माण होणारी अडचण या पुलामुळे दूर झाली आहे.१९८७-८८ या वर्षात वैरागड-मानापूर मार्गावर असलेल्या वैलोचना नदीलगत कमी उचींचा व ज्या ठिकाणातून बारमाही पाणी वाहत असते, अशा ठिकाणी नदी पात्रात रस्ता व पूल तयार करण्यात आला. पावसाळ्यात या पुलावरून अनेकदा पुराचे पाणी वाहत असायचे. परिणामी मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, अंगारा, पिसेवडधा, भाकरोंडी परिसरातील २० गावांच्या वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. मागील वर्षात पुरामुळे तब्बल नऊवेळा या पुलावरून वाहतूक बंद राहिली. नदी पलिकडे वैरागड येथील अनेक शेतकºयांची शेती आहे. अशा शेती कामावर परिणाम झाला. या नदीवरील कमी उंचीच्या पुलाची समस्या आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी प्राधान्याने निधी मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. निधी मंजूर झाल्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये पुलाचे काम सुरू झाले व मे २०१८ मध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली. मागील ३० वर्षांपासून नागरिकांना असलेली उंच पुलाची प्रतीक्षा पूर्णत्वास आली. या पुलाच्या बांधकामाकरिता लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पुलावरून पाणी असतानाही नागरिक शेतात काम करण्याकरिता जीव धोक्यात घालून जायचे. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी वृत्ताची दखल घेऊन पुलाची पाहणीही केली होती.