शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुलामुळे ३० वर्षांची अडचण दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:29 IST

वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात निर्माण होणारी अडचण या पुलामुळे दूर झाली आहे.

ठळक मुद्देवैरागडलगतची वैलोचना नदी : पावसाळ्यात होत असे २० गावांची वाहतूक प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात निर्माण होणारी अडचण या पुलामुळे दूर झाली आहे.१९८७-८८ या वर्षात वैरागड-मानापूर मार्गावर असलेल्या वैलोचना नदीलगत कमी उचींचा व ज्या ठिकाणातून बारमाही पाणी वाहत असते, अशा ठिकाणी नदी पात्रात रस्ता व पूल तयार करण्यात आला. पावसाळ्यात या पुलावरून अनेकदा पुराचे पाणी वाहत असायचे. परिणामी मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, अंगारा, पिसेवडधा, भाकरोंडी परिसरातील २० गावांच्या वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. मागील वर्षात पुरामुळे तब्बल नऊवेळा या पुलावरून वाहतूक बंद राहिली. नदी पलिकडे वैरागड येथील अनेक शेतकºयांची शेती आहे. अशा शेती कामावर परिणाम झाला. या नदीवरील कमी उंचीच्या पुलाची समस्या आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी प्राधान्याने निधी मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. निधी मंजूर झाल्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये पुलाचे काम सुरू झाले व मे २०१८ मध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली. मागील ३० वर्षांपासून नागरिकांना असलेली उंच पुलाची प्रतीक्षा पूर्णत्वास आली. या पुलाच्या बांधकामाकरिता लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पुलावरून पाणी असतानाही नागरिक शेतात काम करण्याकरिता जीव धोक्यात घालून जायचे. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी वृत्ताची दखल घेऊन पुलाची पाहणीही केली होती.