शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

आष्टीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:02 IST

१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतने हटविले अतिक्रमण : फळविक्रेत्यांनी लावली कठड्यांच्या आतमध्ये दुकाने; भाजीविक्रेतेही हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : १० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला आहे.आष्टी हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे. चामोर्शी, गोंडपिपरी, आलापल्लीवरून येणारे रस्ते आष्टीतील चौकात एकमेकांना मिळतात. तिनही मार्गावर बसथांबे आहेत. चंद्रपूर, आलापल्ली, चामोर्शी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा फळ व इतर साहित्याची दुकाने लावण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये येणारे दुकानदार रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. बरेचदा चामोर्शी व गोंडपिपरीवरून आलेली वाहने फळांच्या दुकानामध्ये शिरल्याने अपघात झाले आहे. १० जानेवारी रोजी फळांच्या दुकानाजवळ एक युवक दुचाकी वाहनावर बसून पाहुण्यांची वाट बघत होता. दरम्यान एका पीकअप वाहनाने चुकीच्या बाजूने येऊन दुचाकीला धडक दिली. यात त्या युवकाचा मृत्यू झाला. याच अपघातात चार जण जखमी सुद्धा झाले. याअगोदर चंद्रपूरवरून आलापल्लीकडे जाणाऱ्या ट्रकने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला होता.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात चारही मार्गाने येणारी वाहने, आष्टी शहरातील वाहने, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, पायदळ नागरिक व इतर प्रवाशी यांची नेहमी वर्दळ राहते. त्याचबरोबर छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या ट्रेलरनेही बऱ्याचवेळा वाहतुकीची कोंडी होते. दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरूंद झाला आहे. त्यामुळे पायदळ जाणाºयालाही पुरेशी जागा राहत नाही. जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर व्यापारी, ग्राहक व इतर नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. ही वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस शिपायाने पुढाकार घेण्याची गरज आहे. काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहे. त्याचबरोबर समोर दुकानाएवढे शेडही उभारले आहे.या सर्व परिस्थितीमुळे आष्टी शहरात दरदिवशी लहान-मोठे अपघात होत असतात. अपघात होण्याची अनेक कारणे असली तरी अतिक्रमण हा त्यातील मुख्य कारण आहे.१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर अतिक्रमण हटविण्याची मागणी जोर धरू लागली. ग्रामपंचायतीने सर्व फळविक्रेत्यांना नोटीस बजावून १६ जानेवारीपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मुदत दिली होती. स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास ग्रामपंचायत कारवाई करून आपल्या पद्धतीने अतिक्रमण हटवेल, असा इशारा नोटीसमधून दिला होता. या नोटीसमुळे हादरलेल्या दुकानदारांनी १७ जानेवारी रोजी सकाळीच दुकाने हटविली. ही दुकाने कठड्याच्या आत लावली आहेत.पुन्हा अतिक्रमण न होण्याबाबत खबरदारी गरजेचीग्रामपंचायतीच्या नोटीसनंतर फळविक्रेत्यांनी १७ जानेवारी रोजी स्वत:हून दुकाने हटवून कठड्यांच्या मागे लावली. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, ग्रामविकास अधिकारी बारसागडे, यांच्या नेतृत्त्वातील पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाºयांनी चौकात असलेली भाजीविक्रेत्यांची दुकानेही हटविली. चंद्रपूर मार्गावर ठेवण्यात येत असलेली अ‍ॅटो सुद्धा हटविण्याचे निर्देश दिले.अतिक्रमण हटवून काही दिवस झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर दुकानदार आपले बस्तान मांडतात. हा अनुभव अनेकवेळा आष्टीवासीयांना आला आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या परिसरात ग्रामपंचायतीने फलक लावावा, या फलकावर अतिक्रमण करणाºयांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत