शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

निर्मल भारत पुरस्कार योजना खंडित

By admin | Updated: November 11, 2015 00:53 IST

ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छतेबाबत लोक चळवळ निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली...

ग्राम पंचायतींना सूचना : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे जिल्हा परिषद प्रशासनाला पत्रगडचिरोली : ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छतेबाबत लोक चळवळ निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली निर्मल भारत पुरस्कार योजना केंद्र सरकारने आता खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्राम पंचायतस्तरावर होणाऱ्या स्वच्छता कामाला खिळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी २००३ पासून निर्मल ग्राम पुरस्कार योजना राबविली जात होती. स्वच्छता अभियानात सहभागी ग्राम पंचायतींचे मूल्यमापन करून पुरस्कारप्राप्त ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा देशाची राजधानी दिल्ली येथे सत्कार करण्यात येत होता. काँग्रेस प्रणीत युपीए सरकारच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारचाच या योजनेत पुढाकार होता. देशात गतवर्षी सत्तांतरण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशभर स्वच्छतेला महत्त्व देण्याचा नारा दिला. स्वत: पंतप्रधान स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. देशातील मान्यवर लोक या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सरसावले. मात्र २००३ पासून सुरू असलेली निर्मल ग्राम पुरस्कार योजना केंद्र शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने ६ नोव्हेंबर २०१५ ला यासंदर्भात पत्र पाठवून सदर योजना खंडित करण्यात आलेली आहे. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या स्तरावरून निर्मल ग्राम पुरस्कार दिले जाणार नाही, असे ९ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग संचालक महाराष्ट्र शासन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळविले आहे. जिल्हा परिषदस्तरावरूनही ग्राम पंचायतींना याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता एका चांगल्या योजनेला मुठमाती देण्याचे काम केंद्र सरकारस्तरावरून झाल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागात उमटली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात स्वच्छता अभियान कार्यक्रमाला एकदम खिळ बसेल असेल अशी शक्यता नागरिक व अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. योजना सुरू करण्याची मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)