शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

पाणी योजनेच्या नवीन कामांना ‘ब्रेक’

By admin | Updated: August 13, 2015 00:26 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.

विभागीय स्तरावरून आदेश झळकला : शासन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम गुंडाळणार? दिलीप दहेलकर गडचिरोलीग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यातून पाणी पुरवठ्याची योजना तयार केली जात होती. परंतु केंद्र शासनाने या कार्यक्रमातून नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. केंद्र व राज्य शासन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम गुंडाळण्याच्या विचारात आहे. परिणामी यापुढे ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील पाणी योजनेच्या कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.सातत्याने टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांमध्ये तसेच टंचाई असलेल्या गावांमध्ये नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, नादुरूस्त पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, पाणी योजनेतून संबंधित गावांच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांना नव्याने पाणीपुरवठा करणे, कालावधी संपल्याने कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा योजना नव्याने दुरूस्त करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून यासंदर्भातील कृती आराखडा तयार करून सदर आराखडा राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविला जात होता. यंदा गडचिरोली जिल्हा परिषदेने कोट्यवधी रूपयांच्या पाणी योजनांच्या नव्या कामांचा आराखडा शासनाकडे सादर केला होता. यात बाराही तालुक्यातील एकूण २२५ कामांचा समावेश आहे.राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केंद्र शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी सुरू झालेली व यावर्षी प्रगतीपथावर असलेली तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत रखडलेली पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, मात्र २०१५-१६ या वर्षाच्या कृती आराखड्यात समाविष्ट असलेली तसेच २०१४-१५ च्या आराखड्यात मंजूर असलेली परंतु अद्याप सुरू न झालेली पाणी योजनांची कामेही पुढील आदेश येईपर्यंत हाती घेऊ नये, असे जिल्हा परिषदेला कळविले आहे. फ्लोराईड बाधित व संसद आदर्श ग्राम योजनेतील गावात मात्र पाणी योजनांची कामे सुरू राहणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेतून आतापर्यंत अनेक गावात योजना राबविण्यात आल्या आहेत. अजूनही सदर योजना कार्यान्वित करण्याची ग्रामीण भागातून मागणी सुरूच आहे. मात्र यंदा आराखड्यातील व गतवर्षी मंजूर झालेली कामे सुरू करू नये, असे आदेश केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.सदर महत्त्वकांक्षी योजना बंद झाल्यास ग्रामीण भागातील अनेक खेड्यांना पाणी योजनांच्या लाभापासून सध्यातरी वंचित राहावे लागणार आहे. गावाचा निर्णय गावानेच घ्यावा, या धोरणातून पेयजलासह अन्य महत्त्वाच्या योजना बंद करून १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट ग्राम पंचायतींना निधी देण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरून पाणी योजनेच्या कामात ढिसाळपणा व आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या बाबीवरून सदर योजना बंद करून त्याऐवजी ग्रा. पं. ना थेट निधी देण्याच्या विचारात शासन आहे.