शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सुरसुंडी भागातील बंधारे झाले निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:03 IST

धानोरा तालुक्यातील सुरसुंडी-खांबाडा या मार्गावरील नदीवर चार वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने सिंचन सुविधेच्या निर्मितीसाठी दोन बंधारे बांधले होते.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च व्यर्थ : शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित; प्रशासनाचे नियोजन ढासळले

आॅनलाईन लोकमतसुरसुंडी : धानोरा तालुक्यातील सुरसुंडी-खांबाडा या मार्गावरील नदीवर चार वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने सिंचन सुविधेच्या निर्मितीसाठी दोन बंधारे बांधले होते. मात्र सद्य:स्थितीत या बंधाऱ्याचे दरवाजे बेपत्ता झाल्याने दोन्ही बंधारे कुचकामी ठरले आहेत.धानोरा तालुक्यातील सुरसुंडी, इरूपटोला, शिवटोला व सायगाव या परिसरातील अनेक शेतकरी दवर्षी मक्का व भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. गावालगतच सुरसुंडी-खांबाडा मार्गावर नदी असल्याने शेकडो शेतकरी या नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या सुरसुंडी भागात सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. त्याअनुषंगाने पाटबंधारे विभागामार्फत दोन बंधारे मंजूर करण्यात आले. विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंत्राटदारामार्फत बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र या बंधाऱ्याचा काहीही उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना आजवर झाला नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. परिणामी शासनाचे लाखो रूपये व्यर्थ खर्च झाले.मागील खरीप हंगामात पुरेशा पावसाअभावी धानपीक करपले. तसेच आता खरीप हंगामात शेत जमिनीत ओलावा नसल्याने भाजीपाला पिकाला पाण्याची गरज आहे. मात्र नदीत बांधण्यात आलेल्या बंधाºयाचे दरवाजेच शिल्लक न उरल्याने पावसाळ्यातील पाणी निघून गेले. बंधारा बांधूनही येथे पाणी साचून न राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांनाही या बंधाºयाचा उपयोग झाला नाही. एकूण शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे निरूपयोगी ठरले आहेत. शासनाच्या संबंधित विभागाने तत्काळ या बाबीकडे लक्ष देऊन सुरसुंडी-खांबाडा मार्गावरील नदीवर बांधण्यात आलेल्या दोन्ही बंधाºयांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.