शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

गृहराज्यमंत्र्यांचे ठणकावणे पोलिसांचे मनोबल वाढविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:15 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले. जि.प. केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातही नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांना उद्देशून सूचक विधान केले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले.

रत्नाकर बोमीडवार।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर गेल्या ९ डिसेंबरला प्रथमच चामोर्शी शहरात आले. जि.प. केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातही नक्षली कारवायांच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांना उद्देशून सूचक विधान केले. शस्त्रे खाली ठेऊन शरण या, चर्चा करा असे आवाहन करतानाच प्रेमाने समजत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी सुरक्षा दल सक्षम आहे, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. गेल्या महिनाभरात वाढलेल्या नक्षल कारवायांनी पोलिसांचे टेन्शन वाढविले असताना गृहराज्यमंत्र्यांचे हे ठणकावून सांगणे पोलिसांचे मनोबर वाढविणारे ठरले आहे.संपूर्ण राज्यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल समस्या हद्दपार करण्यासाठी सुरक्षा दलांना जीवाचे रान करावे लागत आहे. पण अनेक वेळा नक्षल्यांच्या हिंसक कृत्यामुळे पोलिसांचे मनोबल खचते. तरीही अलिकडच्या काही वर्षात नक्षली कारवाया बºयाच प्रमाणेत नियंत्रणात आल्या आहेत. पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेलाही बरेच यश येत आहे. भरकटलेल्या नक्षलवाल्यांना आत्मसमर्पणातूनच योग्य मार्ग मिळू शकतो हे गृहराज्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले. विघातक कारवाया करणारे आपले शत्रू नसून त्यांनाही आपल्या मागण्या व विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी आधी शस्त्रे खाली ठेवावी व लोकशाही मार्गाने चर्चा करण्यासाठी शासनासमोर यावे, हा ना.अहीर यांचा सल्ला मोलाचा आहे.ज्या केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ना.अहीर चामोर्शीत आले त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण सचिव, उपसचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा प्रशासकीय अधिकाºयांचीही नावे होती. पण केंद्रीय मंत्री आले असतानाही यापैकी कोणत्याही अधिकाºयाने या कार्यक्रमाला येण्याचे सौजन्य दाखवून नये, ही बाब ना.अहीर यांनाही खटकणारी होती. जाहीर भाषणात यावरून त्यांनी त्या अधिकाºयांना धारेवर धरले. शताब्दी महोत्सवाला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न झाला. परंतु आयोजकांच्या कल्पकतेमुळे सामोपचाराने सर्व कार्यक्रम पार पडले.एखाद्या शाळेने किंवा संस्थेने १०० वर्ष पूर्ण करणे ही बाब त्या संस्थेला नक्कीच गौरवास्पद आहे. त्याहुनही शताब्दी कार्यक्रमास केंद्रीय मंत्री लाभणे निश्चितच उल्लेखनीय आहे. प्रत्येक कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे ही सध्या सर्वांची सवयच झाली आहे. कितीतरी मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या भवितव्याची सकारात्मक चर्चा होणे व शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे हे देखील आवश्यक आहे. परंतु पक्षांच्या राजकारणात आकंठ बुडालेल्या वर्तमान राजकीय नेत्यांना हे समजेल तोच सुदिन म्हणावा लागेल!

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर