शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: June 9, 2017 01:06 IST

राज्यातील शेतकरी १ जूनपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांचे निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राज्यातील शेतकरी १ जूनपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतातील उत्पादीत शेतमालाला उच्च भाव द्यावा, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. राज्यात विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आठवडाभरापासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे हाल होत असतानाही शेतकऱ्यांना केवळ पोकळ आश्वासन शासनाच्या वतीने दिले जात आहे. दिवसेंदिवस शेती तोट्याची होत असून शेती कसण्यासाठी होत असलेला खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देणे गरजेचे आहे. सोबतच शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ करणे व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले व तलावाच्या परिसरात शेती आहे, परंतु येथे सिंचनाची योग्य सोय नसल्याने पाण्याअभावी धानपीक मरते. दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. या भागातील शेतकरी उदनिर्वाह करण्याकरिता लगतच्या आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, चेन्नई आदी ठिकाणी स्थलांतर करीत आहे. या भागातील शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी शासन कुठल्याही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे हित साधण्याकरिता सिंचनाची सोय उपलब्ध करावी. १ जूनपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्ठात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करून कर्जमाफी द्यावी व सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, गोपाळा मडावी, नारायण अलोणे, दिनेश मडावी, मनोज अलोणे, सय्यद मुज्जफर, विमदेव नैताम, जाकिर हुसेन, वसंत नैताम, मेहबुब खान पठाण, रूक्माबाई चांदेकर, विश्वनाथ आत्राम, राजरेड्डी आल्लुरवार, मखमुर शेख, इकबाल सय्यद, युनुस सय्यद, मंजूर सय्यद, राम गुरनुले, बापूजी ठाकरे, सत्यवान मारटकर, सुधाकर नैताम, श्यामराव मेश्राम, भीमराव ओंडरे, बापू मडावी यांनी केली आहे.