शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: June 9, 2017 01:06 IST

राज्यातील शेतकरी १ जूनपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांचे निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राज्यातील शेतकरी १ जूनपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतातील उत्पादीत शेतमालाला उच्च भाव द्यावा, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. राज्यात विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आठवडाभरापासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे हाल होत असतानाही शेतकऱ्यांना केवळ पोकळ आश्वासन शासनाच्या वतीने दिले जात आहे. दिवसेंदिवस शेती तोट्याची होत असून शेती कसण्यासाठी होत असलेला खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देणे गरजेचे आहे. सोबतच शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ करणे व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले व तलावाच्या परिसरात शेती आहे, परंतु येथे सिंचनाची योग्य सोय नसल्याने पाण्याअभावी धानपीक मरते. दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. या भागातील शेतकरी उदनिर्वाह करण्याकरिता लगतच्या आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, चेन्नई आदी ठिकाणी स्थलांतर करीत आहे. या भागातील शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी शासन कुठल्याही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे हित साधण्याकरिता सिंचनाची सोय उपलब्ध करावी. १ जूनपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्ठात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करून कर्जमाफी द्यावी व सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, गोपाळा मडावी, नारायण अलोणे, दिनेश मडावी, मनोज अलोणे, सय्यद मुज्जफर, विमदेव नैताम, जाकिर हुसेन, वसंत नैताम, मेहबुब खान पठाण, रूक्माबाई चांदेकर, विश्वनाथ आत्राम, राजरेड्डी आल्लुरवार, मखमुर शेख, इकबाल सय्यद, युनुस सय्यद, मंजूर सय्यद, राम गुरनुले, बापूजी ठाकरे, सत्यवान मारटकर, सुधाकर नैताम, श्यामराव मेश्राम, भीमराव ओंडरे, बापू मडावी यांनी केली आहे.