शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

युवाशक्तीमुळे भाजपची मते वाढली

By admin | Updated: May 22, 2014 23:53 IST

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजप उमेदवाराला सर्वाधिक ६९ हजाराचे मताधिक्य गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मिळाले आहे.

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजप उमेदवाराला सर्वाधिक ६९ हजाराचे मताधिक्य गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मिळाले आहे. या मताधिक्यामागे युवाशक्ती आघाडीचे प्रमुख नेते न.प.चे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार यांची रणनिती कारणीभूत ठरली, असे दिसून येत आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने कापली व त्यांच्या जागी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. या घटनेनंतर युवाशक्ती आघाडीचे जिल्ह्यासह चिमूर भागातील नेतेही जागृत झाले व त्यांनी या निवडणुकीत उमेदवार उभा न करता भाजपला पाठींबा देण्याबाबत युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर दबाव वाढविला. दरम्यान युवाशक्तीतील एका गटाने नागभिड येथील प्रा. योगेश गोन्नाडे यांची उमेदवारीही दाखल केली होती. परंतु काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना कुठल्याही परिस्थितीत धडा शिकवायचा या ज्वरेने पेटलेल्या युवाशक्तीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोन्नाडेंची उमेदवारी मागे घेऊन अशोक नेते यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला व स्वत: प्रा. राजेश कात्रटवार आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नियोजनबध्द पध्दतीने कामाला लागलेत. एकीकडे भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारासाठी झटत असताना युवाशक्तीचा मोठा फोर्स त्यांच्या ताकदीत मिळाला. त्यामुळे गडचिरोली-चिमूर मतदार संघात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा आमदार असतानाही सर्वाधिक पानिपत याच मतदार संघात काँग्रेसचे झाले. गडचिरोली नगर परिषदेच्या क्षेत्रात ८५०० वर अधिक मताचे लीड भाजपला मिळाले. आमदार उसेंडींशी युवाशक्तीचे कोणतेही व्यक्तीगत हेवेदावे नव्हते. कधी उसेंडी नगर परिषदेच्या कारभारातही बोलले नाहीत. परंतु युवाशक्तीचा सर्व राग हा माजी राज्यमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर होता. त्याची जबर किंमत आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. त्यांच्या स्वत:च्या मतदार संघातही ते ६९ हजाराने मागे गेले. तसेच आरमोरी, चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रातही युवाशक्तीशी झालेल्या भाजप आघाडीचा प्रभाव जाणवला. डॉ. उसेंडी हे वडेट्टीवार यांच्या खेम्यातील उमेदवार नसते तर त्यांच्याविषयी कदाचित अशी परिस्थिती आली नसती, असे राजकीय जाणकारांचे विश्लेषण आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसने विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांना उमेदवारी दिली असती तर युवाशक्ती आघाडी भाजपच्या खेम्यात दाखलही झाली नसती. वरपांगी प्रचार करून कोवासेंच्या बाजुने झुकते माफ देण्याची भुमिका या संघटनेने घेतली असती. काँग्रेसचा पराभव जरी झाला असता तरी पराभवाच्या अंतराचे मताधिक्य मात्र लाखाच्या आत असते, असे जाणकार मानतात. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवाशक्ती आघाडीच्या रणनितीवर अनेक राजकीय पक्षांचे नजर आहे. भारतीय जनता पक्षाजवळ गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरीता सक्षम उमेदवार नाही. युवाशक्ती आघाडीने गडचिरोलीच्या नगराध्यक्षाचे नाव उमेदवारीसाठी समोर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर काँग्रेसचा वडेट्टीवार विरोधक गट पुन्हा एका जुन्या राजकीय नेत्यालाच मैदानात उतरविण्याच्या तयारीला आहे. ६९ हजाराने माघार असल्याने विद्यमान आमदारांना पुन्हा काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही, असा काँग्रेसच्या वडेट्टीवार विरोधक गटाचा दावा आहे. त्यामुळे या मतदार संघात नवा उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार विरोधक करीत आहे व त्यांनी अलिकडेच एक बैठकही घेतली, अशी सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही विधानसभा निवडणुकीच्या तिकीटसाठी जबरदस्त रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. काँग्रेसची हायकमांड कुणाच्या पदरात तिकीट टाकते हे निवडणूक जाहीर झाल्याशिवाय कळणार नाही, हे मात्र निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)