शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भाजप सरकारकडून ओबीसींची दिशाभूल

By admin | Updated: September 13, 2016 01:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करू, राज्यपालांच्या नोकरभरतीच्या अधिसूचनेत दुरूस्ती करून...

शेषराव येलेकर यांचा आरोप : विधानभवनावर ओबीसींचा मोर्चा धडकणारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करू, राज्यपालांच्या नोकरभरतीच्या अधिसूचनेत दुरूस्ती करून स्थानिकांना आरक्षणाच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये संधी देऊ, गैरआदिवासींची ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळण्यात येईल, असे आश्वासन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने भाजप खासदार व आमदारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व राज्यपालांच्या दोन ते तीनदा भेटी घेण्यात आल्या. सहा महिन्यांच्या आत ओबीसींचे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी ओबीसी समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. मात्र एकाही आश्वासनाची सहा महिने उलटूनही पूर्तता झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींची दिशाभूल केली आहे, असा आरोप करीत सरकारने ओबीसींची दिशाभूल तत्काळ थांबवावी, असे आवाहन ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी महासंघाचे निमंत्रक प्रा. शेषराव येलेकर यांनी केले आहे. भाजपच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. मात्र यावेळी सदर पदाधिकाऱ्यांनी मागील भेटीत दिलेली आश्वासन पूर्ण का केली नाहीत, असा जाब न विचारता छायाचित्र काढून शिष्टमंडळ गडचिरोलीला परत आले. भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन ओबीसी समाजाची वारंवार दिशाभूल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील ओबीसी समाजाची स्थिती अतिशय दयनिय झाली आहे. अनेक ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागत आहे. भाजप सरकारच्या विरोधात ओबीसींच्या प्रश्नांना घेऊन ८ डिसेंबर २०१६ रोजी विधानभवनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने १ लाख ओबीसी लोकांचा विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, असे प्रा. शेषराव येलेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)विरोधी पक्षामध्ये असताना ओबीसी फ्रीशिपची मर्यादा ४.५ लाखांवरून ६ लाख करण्यात यावी, यासाठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी अनेकदा सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. मात्र सत्तेवर आल्यावर याबाबतचा जीआर काढण्यासाठी त्यांना दोन वर्ष लागले. त्यातही २०१५-१६ च्या प्रवेशित विद्यार्थ्यांना वाढीव फ्रीशिप उत्पन्न मर्यादेचा लाभ देण्यात येईल, असे चारवेळा सभागृहात सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात जीआर काढताना त्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले, यामुळे भाजप सरकारने ओबीसींचा प्रचंड विश्वासघात केला, असे येलेकर यांनी म्हटले आहे.