शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

भाजपचा ग्रामीण भागात जनाधार वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:20 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

शिवसेना व राकाँला मोठा फटका : काँग्रेसही लाखाच्या घरात गडचिरोली : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात प्रचंड मोठी मुसंडी मारली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक जागा भाजपला या निवडणुकीत मिळाल्या आहे. भाजपने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत १ लाख ३४ हजार ४९६ मते मिळविली आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ लाख १ हजार ८५२ मते मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ हजार ५९१ मते मिळाली आहे. शिवसेनेला २९ हजार ८६८ तर आदिवासी विद्यार्थी संघाला २९ हजार ६८९ मते मिळाली आहे. बहुजन समाज पक्षाला ५ हजार २८ मते मिळाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४३ जागावर निवडणूक लढली तर भारतीय जनता पार्टी ४९ जागांवर निवडणूक लढली. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ४१ जागांवर तर शिवसेना २३ जागांवर निवडणूक लढली. बहुजन समाज पार्टी १२ जागांवर निवडणूक लढली. आदिवासी विद्यार्थी संघ १४ जागांवर निवडणूक लढला. त्या तुलनेत त्यांना ही मते मिळाली आहे. आदिवासी विद्यार्थी संघाला २९ हजार ६८९ मते अवघ्या अहेरी विधानसभा क्षेत्राच्या १४ जागांवर मिळालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही विधानसभा क्षेत्रात काही जागांवर निवडणूक रिंगणात होता. त्यांना त्या तुलनेत ५१ हजार ४३७ मते मिळाली आहे. काँग्रेस गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दोन जागांवर निवडणूक रिंगणात नव्हता तर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत १ लाख १ हजार ७८१ मते मिळाली आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद व त्यानंतर झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा विचार करता भाजपचा जनाधार वाढलेला आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार, आमदार प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले होते. त्या मताधिक्याच्या तुलनेत आता भाजपचा जनाधार बराच घसरलेला दिसत आहे. या निवडणुकीत जरी इतर पक्षाच्या तुलनेत भाजप आघाडीवर असला तरी त्या निकषावर भाजप कमी आहे.