शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

भाजपचा ग्रामीण भागात जनाधार वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:20 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

शिवसेना व राकाँला मोठा फटका : काँग्रेसही लाखाच्या घरात गडचिरोली : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात प्रचंड मोठी मुसंडी मारली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक जागा भाजपला या निवडणुकीत मिळाल्या आहे. भाजपने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत १ लाख ३४ हजार ४९६ मते मिळविली आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ लाख १ हजार ८५२ मते मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ हजार ५९१ मते मिळाली आहे. शिवसेनेला २९ हजार ८६८ तर आदिवासी विद्यार्थी संघाला २९ हजार ६८९ मते मिळाली आहे. बहुजन समाज पक्षाला ५ हजार २८ मते मिळाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४३ जागावर निवडणूक लढली तर भारतीय जनता पार्टी ४९ जागांवर निवडणूक लढली. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ४१ जागांवर तर शिवसेना २३ जागांवर निवडणूक लढली. बहुजन समाज पार्टी १२ जागांवर निवडणूक लढली. आदिवासी विद्यार्थी संघ १४ जागांवर निवडणूक लढला. त्या तुलनेत त्यांना ही मते मिळाली आहे. आदिवासी विद्यार्थी संघाला २९ हजार ६८९ मते अवघ्या अहेरी विधानसभा क्षेत्राच्या १४ जागांवर मिळालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही विधानसभा क्षेत्रात काही जागांवर निवडणूक रिंगणात होता. त्यांना त्या तुलनेत ५१ हजार ४३७ मते मिळाली आहे. काँग्रेस गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दोन जागांवर निवडणूक रिंगणात नव्हता तर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत १ लाख १ हजार ७८१ मते मिळाली आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद व त्यानंतर झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा विचार करता भाजपचा जनाधार वाढलेला आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार, आमदार प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले होते. त्या मताधिक्याच्या तुलनेत आता भाजपचा जनाधार बराच घसरलेला दिसत आहे. या निवडणुकीत जरी इतर पक्षाच्या तुलनेत भाजप आघाडीवर असला तरी त्या निकषावर भाजप कमी आहे.