शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची निकालात मुसंडी

By admin | Updated: November 8, 2015 01:28 IST

नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली.

धानोरात अपक्ष : अहेरीत भाजप, चामोर्शीत काँग्रेस तर मुलचेरात राकाँला निर्विवाद यशगडचिरोली : नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली. तर काँग्रेसने ३४ व राकाँ ३२ जागा जिंकल्या आहे. अहेरी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्ष, चामोर्शीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर मुलचेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. धानोरा नगर पंचायत निवडणुकीत ललीत बरछा यांच्या नेतृत्वातील ग्राम विकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्याच्या नगर पंचायत निवडणुकीचा कौल पाहू जाता सत्ताधारी भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीचा विचार करता काँग्रेसला ३४ व राकाँला ३२ अशा एकूण ६६ जागांवर या दोन पक्षांनी मुसंडी मारली आहे. तर राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांचा विचार करता भाजपला ५० व शिवसेनेला १२ अशा ६२ जागा या पक्षाच्या पदरात पडताना दिसतात. सिरोंचा, एटापल्ली या अहेरी विधानसभा मतदार संघातील नगर पंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व आदिवासी विद्यार्थी संघ मिळून सत्ता स्थापन करू शकतात, अशी स्थिती आहे. भामरागड येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडी करून आपले संख्याबळ १० वर नेऊ शकतात. त्यामुळे अहेरी वगळता भाजपला सत्ता स्थापनेसाठी उपविभागात बरीच कसरत करावी लागणार आहे. मुलचेरा नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागा जिंकून निर्विवाद यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला हे यश मिळाले आहे. अहेरी क्षेत्राचा विचार करता भाजपला ३० तर राकाँला २९ जागा मिळाल्या आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. कुरखेडा येथे भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले असून ७ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. कुरखेडात शिवसेनेचे प्राबल्य असताना सेनेला केवळ ५ जागा मिळाल्या आहे. काँग्रेसला येथे ३ जागा तर राकाँला १ जागा मिळाली आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहू शकते. शिवसेना-भाजप युती झाल्यास ही नगर पंचायत युतीच्या ताब्यात जाईल. कोरचीत सेना-भाजप युती करूनच निवडणूक लढले. त्यामुळे या नगर पंचायतीत त्यांचाच सत्ता स्थापनेसाठी दावा राहील. एकूणच नगर पंचायत निकालाने सत्ताधारी पक्षाला ग्रामीण भागात जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे एक खासदार व एक राज्यमंत्री व तीन आमदार असताना चामोर्शीसारख्या मोठ्या नगर पंचायतीत भाजपला काँग्रेसने प्रचंड तडाखा दिला. याशिवाय धानोरा नगर पंचायतीतही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गडचिरोली क्षेत्रात भाजपची पिछेहाट झाली आहे.