शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भाजपची निकालात मुसंडी

By admin | Updated: November 8, 2015 01:28 IST

नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली.

धानोरात अपक्ष : अहेरीत भाजप, चामोर्शीत काँग्रेस तर मुलचेरात राकाँला निर्विवाद यशगडचिरोली : नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली. तर काँग्रेसने ३४ व राकाँ ३२ जागा जिंकल्या आहे. अहेरी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्ष, चामोर्शीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर मुलचेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. धानोरा नगर पंचायत निवडणुकीत ललीत बरछा यांच्या नेतृत्वातील ग्राम विकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्याच्या नगर पंचायत निवडणुकीचा कौल पाहू जाता सत्ताधारी भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीचा विचार करता काँग्रेसला ३४ व राकाँला ३२ अशा एकूण ६६ जागांवर या दोन पक्षांनी मुसंडी मारली आहे. तर राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांचा विचार करता भाजपला ५० व शिवसेनेला १२ अशा ६२ जागा या पक्षाच्या पदरात पडताना दिसतात. सिरोंचा, एटापल्ली या अहेरी विधानसभा मतदार संघातील नगर पंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व आदिवासी विद्यार्थी संघ मिळून सत्ता स्थापन करू शकतात, अशी स्थिती आहे. भामरागड येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडी करून आपले संख्याबळ १० वर नेऊ शकतात. त्यामुळे अहेरी वगळता भाजपला सत्ता स्थापनेसाठी उपविभागात बरीच कसरत करावी लागणार आहे. मुलचेरा नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागा जिंकून निर्विवाद यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला हे यश मिळाले आहे. अहेरी क्षेत्राचा विचार करता भाजपला ३० तर राकाँला २९ जागा मिळाल्या आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. कुरखेडा येथे भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले असून ७ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. कुरखेडात शिवसेनेचे प्राबल्य असताना सेनेला केवळ ५ जागा मिळाल्या आहे. काँग्रेसला येथे ३ जागा तर राकाँला १ जागा मिळाली आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहू शकते. शिवसेना-भाजप युती झाल्यास ही नगर पंचायत युतीच्या ताब्यात जाईल. कोरचीत सेना-भाजप युती करूनच निवडणूक लढले. त्यामुळे या नगर पंचायतीत त्यांचाच सत्ता स्थापनेसाठी दावा राहील. एकूणच नगर पंचायत निकालाने सत्ताधारी पक्षाला ग्रामीण भागात जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे एक खासदार व एक राज्यमंत्री व तीन आमदार असताना चामोर्शीसारख्या मोठ्या नगर पंचायतीत भाजपला काँग्रेसने प्रचंड तडाखा दिला. याशिवाय धानोरा नगर पंचायतीतही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गडचिरोली क्षेत्रात भाजपची पिछेहाट झाली आहे.