शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

भाजपा राबविणार विकासपर्व अभियान

By admin | Updated: June 11, 2016 01:34 IST

केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर या योजनांचा किती नागरिकांनी लाभ घेतला, ...

गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर या योजनांचा किती नागरिकांनी लाभ घेतला, याचा आढावा घेण्यासाठी विकासपर्व महाअभियान राबविले जाणार असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. केंद्र शासनाला दोन वर्ष व राज्य शासनाला दीड वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत जनतेच्या कल्याणाच्या विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या जाणार आहेत. चामोर्शी तालुक्यात ९, गडचिरोली तालुक्यात ५ व धानोरा तालुक्यात ४ सभा घेतल्या जातील, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. पत्रकार परिषदेला खा. अशोक नेते, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, गजानन येनगंधलवार, सुधाकर येनगंधलवार, रमेश भुरसे, स्वप्नील वरघंटे, अनिल पोहणकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यादरम्यान खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. केंद्र शासनाने शेतकरी सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)