शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भाजप, राष्ट्रवादीचे सूत जमले

By admin | Updated: March 1, 2017 01:34 IST

भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे.

जि.प.मध्ये सत्ता स्थापन करणार : जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ सदस्यांनी दिला गट निर्मितीचा प्रस्ताव गडचिरोली : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे. या दृष्टीकोणातून हालचालींना वेग आला असून मंगळवारी भाजपचे २०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ व रासप समर्थीत एक सदस्य मिळून २६ सदस्यांचा गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजप, राष्ट्रवादी युतीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष पूर्ण प्रयत्न करेल, असे जाहीर केले होते. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपच्या पुढाकारातून २६ सदस्यांच्या गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यामुळे आता भाजपचा जि.प. सत्तेचा राजमार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत ५१ जागांपैकी भाजपला २०, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७ व अपक्ष दोेन व राष्ट्रीय समाज पक्षाला दोन जागा मिळाल्या आहे. कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करावी लागली. दरम्यान सोमवारी गडचिरोली येथे वाकडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला समर्थन देण्यावर एकमत झाल्यानंतर सोमवारी रात्री पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची गडचिरोलीत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत पाठींब्याच्या शर्ती व अटींवर चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक वाटा दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेचा हा समेट झाला. एका अपक्ष सदस्यालाही भाजपने आपल्यासोबत घेत २६ सदस्यांचा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता २१ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना विचारणा केली असता, प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र तो पूर्ण वाचलेला नाही. सदर प्रस्ताव तपासल्यानंतर आपण पुढील कार्यवाही करू, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या गटनेतेपदी सावंगी-विसोरा क्षेत्रातून निवडून आलेले नानाभाऊ नाकाडे यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती आहे. भाजप व राष्ट्रवादीची ही आघाडी झाल्याने जिल्हाभर मंगळवारी याचीच चर्चा होती. पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून भाजपने हे समीकरण तयार केले, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)