शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

भाजप, राष्ट्रवादीचे सूत जमले

By admin | Updated: March 1, 2017 01:34 IST

भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे.

जि.प.मध्ये सत्ता स्थापन करणार : जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ सदस्यांनी दिला गट निर्मितीचा प्रस्ताव गडचिरोली : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे. या दृष्टीकोणातून हालचालींना वेग आला असून मंगळवारी भाजपचे २०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ व रासप समर्थीत एक सदस्य मिळून २६ सदस्यांचा गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजप, राष्ट्रवादी युतीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष पूर्ण प्रयत्न करेल, असे जाहीर केले होते. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपच्या पुढाकारातून २६ सदस्यांच्या गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यामुळे आता भाजपचा जि.प. सत्तेचा राजमार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत ५१ जागांपैकी भाजपला २०, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७ व अपक्ष दोेन व राष्ट्रीय समाज पक्षाला दोन जागा मिळाल्या आहे. कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करावी लागली. दरम्यान सोमवारी गडचिरोली येथे वाकडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला समर्थन देण्यावर एकमत झाल्यानंतर सोमवारी रात्री पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची गडचिरोलीत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत पाठींब्याच्या शर्ती व अटींवर चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक वाटा दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेचा हा समेट झाला. एका अपक्ष सदस्यालाही भाजपने आपल्यासोबत घेत २६ सदस्यांचा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता २१ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना विचारणा केली असता, प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र तो पूर्ण वाचलेला नाही. सदर प्रस्ताव तपासल्यानंतर आपण पुढील कार्यवाही करू, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या गटनेतेपदी सावंगी-विसोरा क्षेत्रातून निवडून आलेले नानाभाऊ नाकाडे यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती आहे. भाजप व राष्ट्रवादीची ही आघाडी झाल्याने जिल्हाभर मंगळवारी याचीच चर्चा होती. पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून भाजपने हे समीकरण तयार केले, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)