शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

भाजप सरकारचे धोरण शेतकरीविरोधी

By admin | Updated: July 1, 2017 01:33 IST

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला ३ हजार ५०० रूपये हमीभाव देण्यात यावा, याकरिता काँग्रेसने अनेक मोर्चे, आंदोलने करून निवेदन सादर केले.

कर्जमाफीसाठी अटीच अटी : पत्रकार परिषदेत आनंदराव गेडाम यांचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला ३ हजार ५०० रूपये हमीभाव देण्यात यावा, याकरिता काँग्रेसने अनेक मोर्चे, आंदोलने करून निवेदन सादर केले. आंदोलनानंतर शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र कर्जमाफी देताना अनेक जाचक अटी लादून शासनाने शेतकऱ्यांमध्ये भेद निर्माण केला. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही. कर्जमाफीतून भाजप सरकार काहीच साध्य करणार नाही. हे सरकार शेतकरी हितविरोधी आहे, असा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी गुरूवारी आरमोरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. आनंदराव गेडाम म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन भाजपला जवळपास तीन वर्षे उलटली. या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनांची एकही पूर्तता शासनाने केली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांंच्या हिताच्या अनेक मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने वारंवार मोर्चे व आंदोलनही करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला शासनाकडे वेळ नाही. काँग्रेस सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र भाजप सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारने कोणतेही निकष न लावता मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाने मोठी दिरंगाई केली. सरसकट कर्जमाफी देताना शासनाने अनेक निकष लादून शेतकऱ्यांमध्ये लहान-मोठा असा भेद निर्माण केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शासनाची मूळातच इच्छा नाही. शेतकऱ्यांमध्ये भेद निर्माण करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचे काम शासनाने केला आहे, असा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केला. पत्रकार परिषदेला सुभाष सपाटे, मिलींद खोब्रागडे, चंदू वडपल्लीवार, चिंतामन ढवळे उपस्थित होते.