शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : चार वर्षांपूर्वी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले. सरकारच्या ...

ठळक मुद्देc

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : चार वर्षांपूर्वी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले. सरकारच्या चुकीचे निर्णय व धोरणामुळे सर्वसामान्यांंचा भ्रमनिराश झाला आहे, असा आरोप महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र दरेकर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.यावेळी माजी जि. प. सदस्य पी. आर. आकरे, ईश्वर कुमरे, विद्यमाने जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, श्रीनिवास आंबटवार, सुभाष सपाटे, विजय सुपारे, शालिक पत्रे, गणेश प्रधान, नंदू खानदेशकर आदी उपस्थित होते.यावेळी दरेकर म्हणाले, नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. दीड कोटी लहान उद्योग व व्यापार डबघाईस आले आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असून खते व बि-बियाणांचे भाव वाढत आहेत. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाºया भाजप सरकारकडून जनतेवर विविध प्रकारचे टॅक्स व कर आकारले जात आहे. शेतकरी व जनतेच्या हिताविरोधी या सरकारची धोरणे आहेत. चार वर्षात या सरकारची कामगिरी काहीच नाही. मात्र जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना शेतकºयांना डिझेलवर सबसिडी मिळत होती. मात्र ही सबसिडी आता बंद करण्यात आली आहे. टॅक्स लावा व पैसा वसूल करा, अशी निती या सरकारकडून अवलंबिली जात आहे. अनेक गंभीर प्रश्न या सरकारच्या काळात निर्माण झाले आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.वित्त आयोगाने राज्य शासनाचा अहवाल सादर केला. यामध्ये सन २०१० ते २०१४ या काळात १७ टक्के महसूल वसूल होत होता. मात्र आता या सरकारच्या काळात वसुलीची टक्केवारी १० टक्क्यावर आहे. हा अहवालसुद्धा सरकारने दाबून ठेवला आहे. गेल्या चार वर्षांत विद्यमान सरकारची कामगिरी शून्य असून या अपयशाचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. अपयश झाकण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा भाजप सरकारकडून पुढे आणला जात आहे, अशी टिका रवींद्र दरेकर यांनी यावेळी केली.रवी व मुल्लूर चक या गावाचे आरमोरी नगर परिषदेत समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे ही दोन्ही गावे बेवारस झाली आहेत. गावातील नागरिकांना दाखले मिळण कठिण झाले आहे. हा प्रश्न घेऊन आपण दिवाळीनंतर जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.