शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

अहेरीत भाजप पहिल्यांदाच वाढली

By admin | Updated: February 28, 2017 00:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती.

चार जागा मिळाल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांच्या परिश्रमाचे फळगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका भाजप केवळ दखलपात्र ठरण्यासाठी येथे उमेदवार उभे केले जात होते. मात्र यशाची कुठलीही अपेक्षा न बाळगता हा कार्यक्रम राबविला जात होता. भाजपचे दिवंगत नेते जोगाजी मडावी, बाजीराव कुुमरे हे अनेकवेळा विधानसभेच्या निवडणुका लढले. मात्र त्यांच्या यश पदरात आले नाही.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या भागात भाजपची ताकद वाढली. अम्ब्रीशराव स्वत: भाजपच्या कमळावर विधानसभेत पोहोचले व या भागात नाविस व भाजपचे जुने कार्यकर्ते असे संयुक्त काम सुरू झाले. त्यामुळे भाजपला आता २८ हजार मतांपर्यंत मजल मारता आली. म्हणजे जवळजवळ १८ हजारांवर मतांची भर भाजपच्या खात्यात नव्याने जमा झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे कुठे नव्हे एवढे मुद्दे एकट्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विरोधकांनी जि. प. च्या रणसंग्रामात उपस्थित केले. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांचा असंतोष, सूरजागड प्रकल्पावरून स्थानिकांचा भाजपवर असलेला रोष शिवाय सिरोंचाच्या रेती तस्करीला भाजपच जबाबदार आहे, हा प्रचार भाजपासाठी प्रचंड फटका देणारा ठरला. केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे खवळलेल्या माओवाद्यांनी भाजपच्या विरोधातच प्रचार ठोकला. याचा परिणाम दुर्गम भागात भाजप उमेदवारांवर झाला. या परिस्थितीतही अम्ब्रीशराव आत्रामांच्या एकट्याच्या बळावर भाजपचा किल्ला त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात टिकविला व पक्षाच्या जागा दोनवरून चारवर नेल्या. स्वत: राणी रूक्मिणीदेवीही भाजपच्या प्रचारासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक भागात फिरल्या. त्यांच्या प्रचारामुळेच कोेठारी-शांतीग्रामची जागा नाविसचे जुने कार्यकर्ते असलेले उरेते परिवार राखू शकले. टीकाकार ही बाब मान्य करण्यास तयार नाही. अम्ब्रीशरावांवर निष्क्रीयतेचा ठपका ठेवत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचा डंका ते पिटवत आहे. भाजपने मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिले. मात्र आविसंने या भागात केलेले आंदोलन प्रभावी झाल्याने सिरोंचा तालुक्यात टेबल वाजला.भामरागड तालुक्यात भाजपचा प्रभाव फारसा दिसला नाही. मात्र पेरमिली-राजाराम हा नाविसचा गड या निवडणुकीतही अम्ब्रीशराव राखून धरू शकले. हे तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र या निवडणुकीतून धडा घेऊन पालकमंत्र्यांनी अहेरीसाठी आता स्वतंत्र वेळ देणे महत्त्वाचा राहणार आहे. लोकांचा संपर्कही वाढविण्याची गरज आहे. दिवसा जरी शक्य झाले नाही, तरी रात्री कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या भावनाही समजून घेणेही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक राहणार आहे, एवढाच संदेश मतदारांनी अम्ब्रीशरांवाना या निकालातून दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)