शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

अहेरीत भाजप पहिल्यांदाच वाढली

By admin | Updated: February 28, 2017 00:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती.

चार जागा मिळाल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांच्या परिश्रमाचे फळगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका भाजप केवळ दखलपात्र ठरण्यासाठी येथे उमेदवार उभे केले जात होते. मात्र यशाची कुठलीही अपेक्षा न बाळगता हा कार्यक्रम राबविला जात होता. भाजपचे दिवंगत नेते जोगाजी मडावी, बाजीराव कुुमरे हे अनेकवेळा विधानसभेच्या निवडणुका लढले. मात्र त्यांच्या यश पदरात आले नाही.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या भागात भाजपची ताकद वाढली. अम्ब्रीशराव स्वत: भाजपच्या कमळावर विधानसभेत पोहोचले व या भागात नाविस व भाजपचे जुने कार्यकर्ते असे संयुक्त काम सुरू झाले. त्यामुळे भाजपला आता २८ हजार मतांपर्यंत मजल मारता आली. म्हणजे जवळजवळ १८ हजारांवर मतांची भर भाजपच्या खात्यात नव्याने जमा झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे कुठे नव्हे एवढे मुद्दे एकट्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विरोधकांनी जि. प. च्या रणसंग्रामात उपस्थित केले. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांचा असंतोष, सूरजागड प्रकल्पावरून स्थानिकांचा भाजपवर असलेला रोष शिवाय सिरोंचाच्या रेती तस्करीला भाजपच जबाबदार आहे, हा प्रचार भाजपासाठी प्रचंड फटका देणारा ठरला. केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे खवळलेल्या माओवाद्यांनी भाजपच्या विरोधातच प्रचार ठोकला. याचा परिणाम दुर्गम भागात भाजप उमेदवारांवर झाला. या परिस्थितीतही अम्ब्रीशराव आत्रामांच्या एकट्याच्या बळावर भाजपचा किल्ला त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात टिकविला व पक्षाच्या जागा दोनवरून चारवर नेल्या. स्वत: राणी रूक्मिणीदेवीही भाजपच्या प्रचारासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक भागात फिरल्या. त्यांच्या प्रचारामुळेच कोेठारी-शांतीग्रामची जागा नाविसचे जुने कार्यकर्ते असलेले उरेते परिवार राखू शकले. टीकाकार ही बाब मान्य करण्यास तयार नाही. अम्ब्रीशरावांवर निष्क्रीयतेचा ठपका ठेवत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचा डंका ते पिटवत आहे. भाजपने मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिले. मात्र आविसंने या भागात केलेले आंदोलन प्रभावी झाल्याने सिरोंचा तालुक्यात टेबल वाजला.भामरागड तालुक्यात भाजपचा प्रभाव फारसा दिसला नाही. मात्र पेरमिली-राजाराम हा नाविसचा गड या निवडणुकीतही अम्ब्रीशराव राखून धरू शकले. हे तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र या निवडणुकीतून धडा घेऊन पालकमंत्र्यांनी अहेरीसाठी आता स्वतंत्र वेळ देणे महत्त्वाचा राहणार आहे. लोकांचा संपर्कही वाढविण्याची गरज आहे. दिवसा जरी शक्य झाले नाही, तरी रात्री कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या भावनाही समजून घेणेही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक राहणार आहे, एवढाच संदेश मतदारांनी अम्ब्रीशरांवाना या निकालातून दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)