शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडात विजेचा लपंडाव

By admin | Updated: July 17, 2017 01:03 IST

मागील १० दिवसांपासून भामरागड तालुक्यात दिवसा व रात्री सुध्दा कधीही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक

भूमिगत केबल टाका : बोटनफुंडी ते कांदोळीपर्यंत जंगलातून पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : मागील १० दिवसांपासून भामरागड तालुक्यात दिवसा व रात्री सुध्दा कधीही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज विभागाने यावर उपाय शोधावा, अशी मागणी होत आहे.भामरागड तालुकास्थळासह इतर ग्रामीण भागाला एटापल्ली तालुक्यातून वीज पुरवठा केला जातो. आलापल्लीमार्गे ताडगावपर्यंत लाईन सुरूळीत सुरू राहते. ताडगावपासून बोटनफुंडी-कांदोळी दरम्यानची लाईन जंगलातून आली आहे. वादळवारा झाल्यानंतर या ठिकाणी झाड पडून वीज पुरवठा खंडीत होत असल्याची वीज विभागाचे म्हणणे आहे. मागील १० दिवसांपासून सातत्याने वीज पुवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सर्व वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे, सक्तीचे करण्यात आले असले तरी बहुतांश वीज कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास तो वेळेवर दुरूस्त केला जात नाही. भामरागड हे तालुकास्थळाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी बँकेसह अनेक शासकीय कार्यालये आहेत. मात्र वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने जनरेटचा वापर शासकीय कार्यालयांमध्ये करावा लागत आहे. काही कार्यालयांमध्ये बॅटऱ्या आहेत. मात्र या बॅटऱ्या पूर्णपणे चार्ज होण्यापूर्वीच विद्युत पुरवठा खंडीत होतो. विजेच्या लपंडावाने यावर्षी शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याकडे वीज विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.ओव्हरहेड लाईन असल्याने झाड पडून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे जंगल भागातून भूमिगत केबल टाकून वीज पुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.