शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

भामरागडात रक्तपेढी द्या!

By admin | Updated: February 9, 2017 01:38 IST

जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात १३० वर सिकलसेल रूग्ण आहेत.

उपसंचालकांकडे मागणी : सिकलसेलग्रस्तांना अनेकदा जाणवते अडचण भामरागड : जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात १३० वर सिकलसेल रूग्ण आहेत. या रूग्णांना नेहमीच रक्ताची आवश्यकता भासत असते. रूग्णांना अहेरी व गडचिरोली येथील रूग्णालयात धाव घ्यावी लागते. परिणामी रूग्णांची गैरसोय होऊन प्रसंगी जीव गमवावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी भामरागड ग्रामीण रूग्णालयात रक्तपेढी सुरू करावी, अशी मागणी सांज संस्था व तालुक्यातील नागरिकांनी नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे. भामरागड येथील तहसीलदारांमार्फत आरोग्य उपसंचालकांना सदर निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड ते अहेरी हे अंतर ७२ किमी असून रूग्णाला नेत असताना प्रवासात अनेक रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भामरागड येथे रक्तपेढी केंद्र देण्याची मागणी अनेकदा तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात आली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले. तालुक्यात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात अनेकजण रक्तदान करतात. ६ फेब्रुवारीला रक्तदान शिबिर घेऊन ३४ बॅग रक्त अहेरी येथे जमा करण्यात आले आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीत रक्त साठवण केंद्राकरिता खोलीही तयार करण्यात आली असून रक्त साठणव केंद्राकरिता आवश्यक असणारी उपकरणेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु सदर उपकरणे धूळखात पडले असून रक्त साठवण केंद्र निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ भामरागड येथे रक्तपेढी केंद्र निर्माण करावे, अशी मागणी सांज माडिया संस्थेचे रूपलाल गोंगले, सचिव शहनाज व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत आरोग्य उपसंचालकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)