शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

भामरागडवासीयांची संघर्ष यात्रा

By admin | Updated: April 29, 2015 01:35 IST

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात....

भामरागड : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात आवाज बुलंद करीत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल पासून संघर्ष यात्रा काढली. भामरागड तालुक्यातील हजारोच्या आदिवासी नागरिकांनी आपले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी अतिदुर्गम भागातून संघर्ष यात्रा काढली आहे.विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी नागरिकांनी २५ एप्रिलपासून संघर्ष यात्रा काढली आहे. सदर संघर्ष यात्रा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी भामरागड तालुका मुख्यालयी पोहोचणार असून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. या संघर्ष यात्रेला भामरागड तहसील विकास कृती समिती, तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कमिटी, वनाधिकार समिती व ग्राम शिक्षण समितीने पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चेकरी आदिवासींच्या मागण्यागडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, बांबूतोड व विक्री ग्रामसभेच्या माध्यमातून व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी, केंद्र सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी विरोधी असल्याने सदर कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, गोहत्या कायदा रद्द करण्यात यावा, भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासाठी नवी इमारत उभारण्यात यावी, तसेच या प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात यावे, आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा.