शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

भामरागड तालुक्याचा विकास कागदावर

By admin | Updated: March 12, 2016 01:42 IST

भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत.

कर्मचाऱ्यांअभावी शहराचा विकास रखडला : न. पं. सभापतींचा शासनावर आरोपभामरागड : भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत. भामरागड तालुक्यात अनेक समस्या कायम असून या तालुक्याचा विकास केवळ कागदावरच आहे, असा आरोप नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरिदास रापेलीवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती देताना सभापती रापेलीवार म्हणाले, विकास करण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने तालुकास्तरावरील सर्व ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर केले. मात्र नगर पंचायतीच्या विकासात अनेक अडचणी कायम आहेत. भामरागड नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार परसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र अभियंता, लेखापाल, लिपीक, शिपाई व इतर पदे रिक्त आहेत. भामरागड नगर पंचायतीला विकासासाठी शासनाने १३७ लाख रूपयांचा निधी दिला आहे. मात्र या नगर पंचायतीत अभियंत्याचे पद रिक्त असल्याने सदर निधी कसा खर्च करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही रापेलीवार यावेळी म्हणाले.यापूर्वी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या तहसीलदारांनी एकूण निधीपैकी केवळ १५ ते २० लाख रूपये खर्च केले. मात्र या खर्चाचा हिशोब अद्यापही दिला नाही. नाली सफाईवर सदर निधी खर्च केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र हिशोब सादर न केल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भामरागड शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील पाणीपुरवठा योजना नादुरूस्त असून त्याच्या दुरूस्तीसाठी ४० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हातपंप दुरूस्ती व देखभालीची ७ लाख ७७ हजार रूपयांची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीची आहे. नगर पंचायत प्रशासन हातपंप दुरूस्त करून पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. नगर पंचायतीच्या विकासासाठी निधी दिला. मात्र नियोजन देण्यात आले नाही. विकासासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. मात्र नियुक्तीकडे शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोेप रापेलीवार यांनी यावेळी केला. (तालुका प्रतिनिधी)