शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

भामरागड तालुक्याचा विकास कागदावर

By admin | Updated: March 12, 2016 01:42 IST

भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत.

कर्मचाऱ्यांअभावी शहराचा विकास रखडला : न. पं. सभापतींचा शासनावर आरोपभामरागड : भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत. भामरागड तालुक्यात अनेक समस्या कायम असून या तालुक्याचा विकास केवळ कागदावरच आहे, असा आरोप नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरिदास रापेलीवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती देताना सभापती रापेलीवार म्हणाले, विकास करण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने तालुकास्तरावरील सर्व ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर केले. मात्र नगर पंचायतीच्या विकासात अनेक अडचणी कायम आहेत. भामरागड नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार परसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र अभियंता, लेखापाल, लिपीक, शिपाई व इतर पदे रिक्त आहेत. भामरागड नगर पंचायतीला विकासासाठी शासनाने १३७ लाख रूपयांचा निधी दिला आहे. मात्र या नगर पंचायतीत अभियंत्याचे पद रिक्त असल्याने सदर निधी कसा खर्च करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही रापेलीवार यावेळी म्हणाले.यापूर्वी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या तहसीलदारांनी एकूण निधीपैकी केवळ १५ ते २० लाख रूपये खर्च केले. मात्र या खर्चाचा हिशोब अद्यापही दिला नाही. नाली सफाईवर सदर निधी खर्च केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र हिशोब सादर न केल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भामरागड शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील पाणीपुरवठा योजना नादुरूस्त असून त्याच्या दुरूस्तीसाठी ४० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हातपंप दुरूस्ती व देखभालीची ७ लाख ७७ हजार रूपयांची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीची आहे. नगर पंचायत प्रशासन हातपंप दुरूस्त करून पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. नगर पंचायतीच्या विकासासाठी निधी दिला. मात्र नियोजन देण्यात आले नाही. विकासासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. मात्र नियुक्तीकडे शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोेप रापेलीवार यांनी यावेळी केला. (तालुका प्रतिनिधी)