शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड-ताडगाव मार्ग चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:22 IST

भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे.

ठळक मुद्देखड्डे बुजविण्यासाठी टाकला मातीमिश्रीत मुरूम : डांबरी रस्ता ओळखणे झाले कठीण; वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून वाहनधारकांना या मातीचा त्रास आता पावसाळाभर सहन करावा लागणार आहे.भामरागड-आलापल्ली मार्गावर असलेल्या ताडगाव येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ताडगाव भामरागडपासून १२ किमी अंतरावर आहे. भामरागड, आलापल्ली मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. ताडगाव येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदाराने चांगले मुरूम न टाकता माती मिश्रीत मुरूम टाकले. पावसामुळे व वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील मातीमिश्रीत मुरूम बाहेर पडल्याने आता चिखल झाला आहे. संपूर्ण डांबरी रस्त्यावर चिखल पसरला आहे. चिखल वाहनाच्या टायरला चिपकत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. त्याचबरोबर सदर चिखल वाहनधारकावरही पडत असल्याने कपडे खराब होत आहेत. बांधकाम विभागाबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.इतरही रस्त्यांची दयनीय अवस्थाभामरागड तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. भामरागड तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल. या तालुक्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याला कमी निधी दिला जातो. बांधकाम विभागाचीही तिच स्थिती आहे. निधीअभावी तालुक्यातील अनेक रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी झाली नाही. तर काही गावे अजूनपर्यंत रस्त्याने सुद्धा जोडण्यात आले नाही. रस्तेच नसल्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या गावापर्यंत पोहोचत नाही. गावातील नागरिकही कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. परिणामी भामरागड तालुक्याचा विकास रखडला आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग