शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

भामरागड-ताडगाव मार्ग चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:22 IST

भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे.

ठळक मुद्देखड्डे बुजविण्यासाठी टाकला मातीमिश्रीत मुरूम : डांबरी रस्ता ओळखणे झाले कठीण; वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून वाहनधारकांना या मातीचा त्रास आता पावसाळाभर सहन करावा लागणार आहे.भामरागड-आलापल्ली मार्गावर असलेल्या ताडगाव येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ताडगाव भामरागडपासून १२ किमी अंतरावर आहे. भामरागड, आलापल्ली मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. ताडगाव येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदाराने चांगले मुरूम न टाकता माती मिश्रीत मुरूम टाकले. पावसामुळे व वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील मातीमिश्रीत मुरूम बाहेर पडल्याने आता चिखल झाला आहे. संपूर्ण डांबरी रस्त्यावर चिखल पसरला आहे. चिखल वाहनाच्या टायरला चिपकत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. त्याचबरोबर सदर चिखल वाहनधारकावरही पडत असल्याने कपडे खराब होत आहेत. बांधकाम विभागाबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.इतरही रस्त्यांची दयनीय अवस्थाभामरागड तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. भामरागड तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल. या तालुक्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याला कमी निधी दिला जातो. बांधकाम विभागाचीही तिच स्थिती आहे. निधीअभावी तालुक्यातील अनेक रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी झाली नाही. तर काही गावे अजूनपर्यंत रस्त्याने सुद्धा जोडण्यात आले नाही. रस्तेच नसल्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या गावापर्यंत पोहोचत नाही. गावातील नागरिकही कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. परिणामी भामरागड तालुक्याचा विकास रखडला आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग