शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भामरागड प्रकल्प ठरला क्रीडा संमेलनाचा बाजीगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:14 IST

आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे.

ठळक मुद्देदेवरी प्रकल्पाला उपविजेतेपद : सलग ११ वेळा भामरागडची चमू ठरली विजेती; आश्रमशाळांच्या संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे. नक्षलग्रस्त भागातील या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सामन्यांमध्ये देवरी प्रकल्प उपविजेता ठरला आहे.पारितोषीक वितरण कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपआयुक्त सुरेंद्र सावरकर, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका लता लाटकर, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, भंडाराचे प्रकल्प अधिकारी पी. पृथ्वीराज, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, नागपूरचे पीओ दिगंबर चव्हाण, सहायक आयुक्त दीपक हेडाऊ, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. क्रीडा संमेलनाचे अहवाल वाचन प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. संचालन अनिल सोमनकर तर आभार उपआयुक्त सुरेंद्र सावरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी लेखाधिकारी किशोर वाढ, कार्यालय अधीक्षक डी. के. टिंगुसले, सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, डब्ल्यू. टी. राऊत, छाया घुटके, क्रीडा अधिकारी मदन टापरे, क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, सुधाकर गौरकार, सुधीर शेंडे, विनोद कुलकर्णी, व्ही. वाय. भिवगडे, जे. एन. नैताम, डब्ल्यू. के. कोडाप, नोडल अधिकारी आर. टी. निंबोडकर, डी. व्ही. विरूटकर, सुभाष लांडे, संदीप भोयर, भास्कर मदनकर यांनी सहकार्य केले.गडचिरोली प्रकल्प तिसरागडचिरोली येथील क्रीडा संमेलनाचे आयोजन प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या दर्जाप्रमाणे होते. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्पाने तिसरे स्थान पटकाविले. भामरागड हा अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका असतानाही येथील विद्यार्थ्यांनी सलग ११ वेळा विजेतेपद पटकाविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.