शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

दमदार पावसाने रोवणीला वेग

By admin | Updated: July 4, 2016 01:05 IST

मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

कमी मजुरीने शेतकऱ्यांना लाभ : १८ हजार हेक्टरवर होणार धानाची रोवणीवैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाऊस असाच सुरू राहल्यास रोवणीच्या कामाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चालू खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात १८ हजार २३० हेक्टरवर धानाचा पेरा आहे. सोयाबिनचे पीक १९ हेक्टरवर घेतले जाणार आहे. तसेच तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचेही लागवड केली जाते. मात्र यामध्ये मुख्य पीक धानाचे आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने बहुतांश शेतकऱ्याने धानाचे पऱ्हे टाकले नव्हते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची वाट न बघता धानाचे पऱ्हे टाकले होते व ते आता रोवण्यायोग्य झाले होते. शेतकरी वर्ग केवळ पाऊस बरसण्याची वाट बघत होता. अशातच मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास ज्या शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पऱ्हे टाकले होते. ते पऱ्हे सुध्दा पुढील आठ दिवसात रोवणीसाठी तयार होणार आहेत. त्यामुळे इतरही शेतकरी रोवणीला सुरूवात करतील. त्यामुळे पुढील आठ दिवसात रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग प्रसन्न आहे. जेवढे लवकर धानाची रोवणी होते. तेवढी उत्पादनात वाढ होते. हा दरवर्षीचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पाऊस लागताच रोवणीला सुरूवात केली जाते. सद्य:स्थितीत कमी प्रमाणात रोवणी सुरू आहे. त्यामुळे मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अधिकची मजुरीही द्यावी लागत नाही. दिवस मोठा असल्याने व रोवणीचे काम नुकतेच सुरूवात झाल्याने मजुरांमध्ये सुध्दा उत्साह आहे. त्यामुळे कमी मजुरीत अधिक काम होत असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. वैरागड परिसरातील काही शेतकऱ्यांकडे स्वत:च्या बोड्या आहेत. त्याचबरोबर मामा तलांवाचे पाणी सुध्दा दिले जाते. त्यामुळे वैरागड परिसरातील धान पीक पाण्याअभावी सहजासहजी करपत नाही. (वार्ताहर)शेतात गवत व पालापाचोळा तयार होतो. सदर पालापाचोळा चिखलणीच्या वेळी शेतातच गाळून टाकल्यास त्यापासून चांगले शेंद्रीय खत तयार होते. अनेक शेतकरी पालापाचोळा व धानाची तणीस जाळून टाकतात. तसे करण्याऐवजी ते जमिनीत मुरवावे, यामुळे सेंद्रीय खत तयार होते. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.- ए. एल. कटरे, तालुका कृषी अधिकारी आरमोरी