शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

दमदार पावसाने रोवणीला वेग

By admin | Updated: July 4, 2016 01:05 IST

मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

कमी मजुरीने शेतकऱ्यांना लाभ : १८ हजार हेक्टरवर होणार धानाची रोवणीवैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाऊस असाच सुरू राहल्यास रोवणीच्या कामाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चालू खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात १८ हजार २३० हेक्टरवर धानाचा पेरा आहे. सोयाबिनचे पीक १९ हेक्टरवर घेतले जाणार आहे. तसेच तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचेही लागवड केली जाते. मात्र यामध्ये मुख्य पीक धानाचे आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने बहुतांश शेतकऱ्याने धानाचे पऱ्हे टाकले नव्हते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची वाट न बघता धानाचे पऱ्हे टाकले होते व ते आता रोवण्यायोग्य झाले होते. शेतकरी वर्ग केवळ पाऊस बरसण्याची वाट बघत होता. अशातच मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास ज्या शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पऱ्हे टाकले होते. ते पऱ्हे सुध्दा पुढील आठ दिवसात रोवणीसाठी तयार होणार आहेत. त्यामुळे इतरही शेतकरी रोवणीला सुरूवात करतील. त्यामुळे पुढील आठ दिवसात रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग प्रसन्न आहे. जेवढे लवकर धानाची रोवणी होते. तेवढी उत्पादनात वाढ होते. हा दरवर्षीचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पाऊस लागताच रोवणीला सुरूवात केली जाते. सद्य:स्थितीत कमी प्रमाणात रोवणी सुरू आहे. त्यामुळे मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अधिकची मजुरीही द्यावी लागत नाही. दिवस मोठा असल्याने व रोवणीचे काम नुकतेच सुरूवात झाल्याने मजुरांमध्ये सुध्दा उत्साह आहे. त्यामुळे कमी मजुरीत अधिक काम होत असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. वैरागड परिसरातील काही शेतकऱ्यांकडे स्वत:च्या बोड्या आहेत. त्याचबरोबर मामा तलांवाचे पाणी सुध्दा दिले जाते. त्यामुळे वैरागड परिसरातील धान पीक पाण्याअभावी सहजासहजी करपत नाही. (वार्ताहर)शेतात गवत व पालापाचोळा तयार होतो. सदर पालापाचोळा चिखलणीच्या वेळी शेतातच गाळून टाकल्यास त्यापासून चांगले शेंद्रीय खत तयार होते. अनेक शेतकरी पालापाचोळा व धानाची तणीस जाळून टाकतात. तसे करण्याऐवजी ते जमिनीत मुरवावे, यामुळे सेंद्रीय खत तयार होते. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.- ए. एल. कटरे, तालुका कृषी अधिकारी आरमोरी