शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

दमदार पावसाने रोवणीला वेग

By admin | Updated: July 4, 2016 01:05 IST

मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

कमी मजुरीने शेतकऱ्यांना लाभ : १८ हजार हेक्टरवर होणार धानाची रोवणीवैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने वैरागड परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाऊस असाच सुरू राहल्यास रोवणीच्या कामाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चालू खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात १८ हजार २३० हेक्टरवर धानाचा पेरा आहे. सोयाबिनचे पीक १९ हेक्टरवर घेतले जाणार आहे. तसेच तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचेही लागवड केली जाते. मात्र यामध्ये मुख्य पीक धानाचे आहे. मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने बहुतांश शेतकऱ्याने धानाचे पऱ्हे टाकले नव्हते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची वाट न बघता धानाचे पऱ्हे टाकले होते व ते आता रोवण्यायोग्य झाले होते. शेतकरी वर्ग केवळ पाऊस बरसण्याची वाट बघत होता. अशातच मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास ज्या शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी पऱ्हे टाकले होते. ते पऱ्हे सुध्दा पुढील आठ दिवसात रोवणीसाठी तयार होणार आहेत. त्यामुळे इतरही शेतकरी रोवणीला सुरूवात करतील. त्यामुळे पुढील आठ दिवसात रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग प्रसन्न आहे. जेवढे लवकर धानाची रोवणी होते. तेवढी उत्पादनात वाढ होते. हा दरवर्षीचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पाऊस लागताच रोवणीला सुरूवात केली जाते. सद्य:स्थितीत कमी प्रमाणात रोवणी सुरू आहे. त्यामुळे मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अधिकची मजुरीही द्यावी लागत नाही. दिवस मोठा असल्याने व रोवणीचे काम नुकतेच सुरूवात झाल्याने मजुरांमध्ये सुध्दा उत्साह आहे. त्यामुळे कमी मजुरीत अधिक काम होत असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. वैरागड परिसरातील काही शेतकऱ्यांकडे स्वत:च्या बोड्या आहेत. त्याचबरोबर मामा तलांवाचे पाणी सुध्दा दिले जाते. त्यामुळे वैरागड परिसरातील धान पीक पाण्याअभावी सहजासहजी करपत नाही. (वार्ताहर)शेतात गवत व पालापाचोळा तयार होतो. सदर पालापाचोळा चिखलणीच्या वेळी शेतातच गाळून टाकल्यास त्यापासून चांगले शेंद्रीय खत तयार होते. अनेक शेतकरी पालापाचोळा व धानाची तणीस जाळून टाकतात. तसे करण्याऐवजी ते जमिनीत मुरवावे, यामुळे सेंद्रीय खत तयार होते. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.- ए. एल. कटरे, तालुका कृषी अधिकारी आरमोरी