शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

धानासह सोयाबीन पिकावर रोग बरसला

By admin | Updated: September 30, 2014 23:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागानेही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना रोग प्रतिबंधक उपाययोजना सुचविल्या आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानपीकाचे क्षेत्र १ लाख ४९ हजार २६० हेक्टर आहे. सोयाबीन पिकाचे क्षेत्र ६ हजार ३२० हेक्टर, कापूस १ हजार २८० तर तूर ४ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर आहे. खरीप हंगामातील पीक सध्या वाढीव अवस्थेत आहे. पावसात खंड पडल्यामुळे रोवणीचे काम मध्यंतरी खोळंबली होती. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने रोवणीचे काम आटोपले असून जिल्ह्यात नियोजीत सर्व क्षेत्रावर पीक घेण्यात येत आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. मात्र भाताचे पीक सध्या फुटव्याच्या व पोटऱ्या येण्याच्या अवस्थेत असताना समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले येईल, अशी आशा होती. मात्र भात पीकावर तुरळक प्रमाणात पाने गुंडाळणारी अळी व खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच करपा व कडा करपा या रोगाचासुध्दा काही भागात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्चही फवारणीच्यासाठी नियोजित अंदाजपत्रकापेक्षा वाढत आहे. यंदा पाऊस उशीरा आल्याने मजुरीचा व मशागतीचा खर्चही वाढला आहे. दरवेळी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा शेतकऱ्यांना फवारणीचे अधिक डोज द्यावे लागत आहे. सोयाबीन पिकावरही हिरवी उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना यावर उपाययोजना सुचवित असले तरी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक किडीच्या प्रादुर्भावामुळे हातून जाण्याच्या परिस्थिती आहे. कपाशीचे पीक फूल व बोंड पकडण्याच्या अवस्थेत आहे. उशीरा पेरणी झालेले पीक वाढीव अवस्थेत आहे. कापसावरही तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पीकावर मर आणि पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकूणच खरीप हंगामातील चारही प्रमुख पीक किडीच्या विळख्यात सापडल्याने बळीराजाचे डोळे पाणावलेले आहेत. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली. कर्ज काढून शेतकरी शेती करीत असताना आता हातातोंडाशी आलेले पीक किडीच्या प्रादुर्भामुळे उद्ध्वस्त होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे.