शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

धानासह सोयाबीन पिकावर रोग बरसला

By admin | Updated: September 30, 2014 23:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागानेही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना रोग प्रतिबंधक उपाययोजना सुचविल्या आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानपीकाचे क्षेत्र १ लाख ४९ हजार २६० हेक्टर आहे. सोयाबीन पिकाचे क्षेत्र ६ हजार ३२० हेक्टर, कापूस १ हजार २८० तर तूर ४ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर आहे. खरीप हंगामातील पीक सध्या वाढीव अवस्थेत आहे. पावसात खंड पडल्यामुळे रोवणीचे काम मध्यंतरी खोळंबली होती. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने रोवणीचे काम आटोपले असून जिल्ह्यात नियोजीत सर्व क्षेत्रावर पीक घेण्यात येत आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. मात्र भाताचे पीक सध्या फुटव्याच्या व पोटऱ्या येण्याच्या अवस्थेत असताना समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले येईल, अशी आशा होती. मात्र भात पीकावर तुरळक प्रमाणात पाने गुंडाळणारी अळी व खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच करपा व कडा करपा या रोगाचासुध्दा काही भागात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्चही फवारणीच्यासाठी नियोजित अंदाजपत्रकापेक्षा वाढत आहे. यंदा पाऊस उशीरा आल्याने मजुरीचा व मशागतीचा खर्चही वाढला आहे. दरवेळी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा शेतकऱ्यांना फवारणीचे अधिक डोज द्यावे लागत आहे. सोयाबीन पिकावरही हिरवी उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना यावर उपाययोजना सुचवित असले तरी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक किडीच्या प्रादुर्भावामुळे हातून जाण्याच्या परिस्थिती आहे. कपाशीचे पीक फूल व बोंड पकडण्याच्या अवस्थेत आहे. उशीरा पेरणी झालेले पीक वाढीव अवस्थेत आहे. कापसावरही तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पीकावर मर आणि पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकूणच खरीप हंगामातील चारही प्रमुख पीक किडीच्या विळख्यात सापडल्याने बळीराजाचे डोळे पाणावलेले आहेत. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली. कर्ज काढून शेतकरी शेती करीत असताना आता हातातोंडाशी आलेले पीक किडीच्या प्रादुर्भामुळे उद्ध्वस्त होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे.