शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

३०० जोडप्यांना ‘शुभमंगल’चा लाभ

By admin | Updated: August 8, 2015 01:28 IST

जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह ...

दोन वर्षांत : ३६ लाख वितरित; २०१४-१५ मध्ये १०० जोडप्यांचे प्रस्ताव सादरगडचिरोली : जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या ३०० लाभार्थ्यांना १२ हजार रूपये प्रमाणे एकूण ३६ लाखांचे अनुदान दोन वर्षांच्या कालावधीत वितरित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. नागरिकांना आपल्या मुला, मुलींचे लग्न करताना कर्जाचा डोंगर माथ्यावर करून विवाह सोहळा पार पाडावा लागतो. यातून अनेक मुलींचे वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात. सर्वसामान्य पालकांनी लग्नसोहळ्याच्या कर्जामुळे आत्महत्या करू नये, नागरिकांच्या पैशाची बचत व्हावी, या हेतूने शासनाने शुभमंगल योजना कार्यान्वित केली आहे. सन २०१३-१४ या वर्षात विविध संस्थांमार्फत आयोजन करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या २०० जोडप्यांचे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. तसेच २०१४-१५ या वर्षात सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या १०० जोडप्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर शासनाकडून मागणीनुसार मिळालेल्या निधीतून दोन्ही वर्षातील जोडप्यांना एकूण ३६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)लाभासाठी आवश्यक कागदपत्रेशुभमंगल योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावासोबत वर-वधूचा जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर-वधूने सक्षम प्राधिकरणासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, वधूचे आईवडील शेतकरी, शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधूच्या पालकांचे एक लाखांच्या आत उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचा दाखला, विवाह प्रथम असल्याचे तलाठी अथवा ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, वधूच्या आईच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, वधूची आई नसल्यास वडीलांचे बँक खाते, ते ही नसल्यास वधूच्या बँक खात्याची झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.