शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

३०० जोडप्यांना ‘शुभमंगल’चा लाभ

By admin | Updated: August 8, 2015 01:28 IST

जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह ...

दोन वर्षांत : ३६ लाख वितरित; २०१४-१५ मध्ये १०० जोडप्यांचे प्रस्ताव सादरगडचिरोली : जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या ३०० लाभार्थ्यांना १२ हजार रूपये प्रमाणे एकूण ३६ लाखांचे अनुदान दोन वर्षांच्या कालावधीत वितरित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. नागरिकांना आपल्या मुला, मुलींचे लग्न करताना कर्जाचा डोंगर माथ्यावर करून विवाह सोहळा पार पाडावा लागतो. यातून अनेक मुलींचे वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात. सर्वसामान्य पालकांनी लग्नसोहळ्याच्या कर्जामुळे आत्महत्या करू नये, नागरिकांच्या पैशाची बचत व्हावी, या हेतूने शासनाने शुभमंगल योजना कार्यान्वित केली आहे. सन २०१३-१४ या वर्षात विविध संस्थांमार्फत आयोजन करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या २०० जोडप्यांचे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. तसेच २०१४-१५ या वर्षात सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या १०० जोडप्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर शासनाकडून मागणीनुसार मिळालेल्या निधीतून दोन्ही वर्षातील जोडप्यांना एकूण ३६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)लाभासाठी आवश्यक कागदपत्रेशुभमंगल योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावासोबत वर-वधूचा जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर-वधूने सक्षम प्राधिकरणासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, वधूचे आईवडील शेतकरी, शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधूच्या पालकांचे एक लाखांच्या आत उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचा दाखला, विवाह प्रथम असल्याचे तलाठी अथवा ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, वधूच्या आईच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, वधूची आई नसल्यास वडीलांचे बँक खाते, ते ही नसल्यास वधूच्या बँक खात्याची झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.