शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

१८८ निराधारांना अनुदानाचा लाभ

By admin | Updated: June 8, 2015 02:16 IST

स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या सभेत १८८ निराधार लाभार्थ्यांचे अर्ज अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले.

आरमोरी तहसील : ३३८ अर्ज झाले होते प्राप्त आरमोरी : स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या सभेत १८८ निराधार लाभार्थ्यांचे अर्ज अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे आता या नागरिकांना मासिक ६०० रूपये अनुदान मिळणार असल्याने जीवन जगणे सुसह्य होण्यास मदत झाली आहे. अपंग व वृध्द नागरिक काम शकू शकत नसल्याने या नागरिकांना जीवन जगण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरविल्याशिवाय पर्याय राहत नाही. तर दुसरीकडे अपंग व वृध्द नागरिकांना औषधोपचारावर आगाऊचा खर्च करावा लागतो. हा सुध्दा खर्च कशा पध्दतीने करावा, असा प्रश्न निर्माण होतो. या नागरिकांना महिन्याकाठी एक निश्चित अनुदान देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात संबंधित लाभार्थ्याला अर्ज करावा लागतो. आरमोरी तहसील कार्यालयात विविध निराधार योजनांचे एकूण ३३८ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाणनी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी तहसीलदार जी. टी. वलथरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला नायब तहसीलदार गजानन बन्सोड, आर. एम. मेश्राम, विश्रांती बागडे, प्रशांत लाड आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयाकडे संजय गांधी निराधार योजनेचे ७६ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ४५ प्रकरणांना मंजुरी प्रदान करण्यात आली. सात अर्ज नामंजूर करण्यात आले तर २४ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आली आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ९६ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ५१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. २५ प्रकरणे नामंजूर तर २० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १५३ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ८४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. ३१ प्रकरणे नामंजूर तर ३८ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजनेचे १२ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी सात प्रकरणे मंजूर करण्यात आली. दोन नामंजूर तर तीन प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा एक अर्ज प्राप्त झाला. सदर अर्ज मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे सर्वच योजनांचे एकूण ३३८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८८ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. ६५ अर्ज नामंजूर तर ८५ अर्जांवर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. ज्या नागरिकांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, त्या नागरिकांना मासिक ६०० रूपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)अनुदान वाढीची होत आहे मागणीनिराधार नागरिकांना शासनाकडून महिन्याला ६०० रूपयांचे अनुदान दिले जाते. वाढलेल्या महागाईमध्ये सदर रक्कम अत्यंत कमी आहे. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी निराधार नागरिकांकडून मागील दोन वर्षांपासून सातत्याने शासनाकडे लावून धरली आहे. मात्र शासनाने अजुनपर्यंत या अनुदानात वाढ केली नाही.सहा महिने उलटूनही समितीचे गठन रखडलेनिराधार नागरिकांचे अर्ज संजय गांधी निराधार समितीच्या मार्फतीने मंजूर करण्यात येतात. या समितीवर एकूण सात सदस्य राहतात. यातील अध्यक्षासह पाच सदस्य अशासकीय तर तहसीलदार व बीडीओ हे दोन सदस्य शासकीय राहतात. भाजपा सरकारने सहा महिन्यापूर्वीच जुनी समिती बरखास्त केली आहे. मात्र नवीन समितीचे गठन अजुनपर्यंत करण्यात आले नाही. त्यामुळे अर्ज निवडीची प्रक्रिया तहसीलदारांना पूर्ण करावी लागत आहे. अशासकीय सदस्यांना निराधार नागरिकांची प्रत्यक्ष परिस्थिती माहित राहत असल्याने या सदस्यांकडून नागरिकांना न्याय मिळतो. त्याचबरोबर अपात्र व्यक्तीला या योजनेपासून दूर ठेवण्यासही मदत होते. त्यामुळे समिती गठीत करण्याची मागणी होत आहे.