शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

माना समाजाचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:07 IST

माना समाजाच्या अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२४) गडचिरोली शहरातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पूर्व विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त माना समाजबांधव सहभागी झाले होते.

ठळक मुद्देप्रशासन हादरले : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर विशाल मोर्चा धडकला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माना समाजाच्या अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२४) गडचिरोली शहरातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पूर्व विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त माना समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे स्वरूप पाहून जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणाही हादरून गेली होती.विदर्भ आदिवासी माना समाज कृती समिती व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून कार्यालयावर निघालेला हा मोर्चा कॉम्प्लेक्स परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडकला. या विशाल मोर्चातून माना समाजाने शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.माना समाज संघटनेमार्फत केलेल्या आवाहनानुसार, सदर मोर्चासाठी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यातील समाजबांधव सकाळी १०.३० वाजतापासून गडचिरोली शहरात दाखल झाले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात एकत्र जमले. एक ते दीड तासात सर्वसमाज बांधव येथे एकत्र आले. त्यानंतर सदर मोर्चेकरी समाजबांधव शिस्तीत कॉम्प्लेक्स परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडे निघाले. या मोर्चात विद्यार्थी, युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्समार्गे आयटीआय चौक ते समिती कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहोचला. दरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सदर मोर्चादरम्यान समाजातीलच युवक स्वयंसेवकाची भूमिका बजावत होते. अत्यंत शिस्तीच्या वातावरणात शांततेत समाजाचा मोर्चा कार्यालयावर धडकला. मोर्चा कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. या सभेत समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांना संबोधित केले.यावेळी मोर्चाचे संयोजक अ‍ॅड.नारायण जांभुळे, माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, बळीराम गरमळे, देविदास जांभुळे, अरविंद सांधेकर, भगवान नन्नावरे, श्यामराव नन्नावरे, शंकर भरडे, माधवराव जांभुळे, नंदू दडमल, शांतराम चौखे, गोविंदराव चौधरी, गुलाब हनवते, विवेक शेंडे, कुलदीप श्रीरामे, गोपाळराव मगरे, केशव जांभुळे, रमेश राणे, मनीष नारनवरे, बाळू सावसाकडे, बाळकृष्ण राजनहिरे, देवराव नन्नावरे, भाऊराव धारणे, रामराव नन्नावरे, कुलदीप श्रीरामे आदी उपस्थित होते.मोर्चाला मार्गदर्शन करताना अ‍ॅड.जांभुळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशानुसार समिती कार्यालय व प्रशासनाने माना जमातीच्या मागण्या निकाली काढाव्यात, जुने प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढावे, माना समाज संघटीत असल्याने आम्ही आमचे अधिकार व हक्क घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध १७ मागण्यांचे निवेदन यापूर्वीच देण्यात आले आहे. सदर दोन्ही नेत्यांनी यावर विचार करून ३० आॅक्टोबरपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सचिवस्तरावर मागण्यांवर चर्चा होण्यासाठी बैठक लावावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे अ‍ॅड.जांभुळे यावेळी म्हणाले. शासनस्तरावर मागण्या निकाली काढण्याबाबत कार्यवाही झाली नाही तर ४ नोव्हेंबर रोजी ना.हंसराज अहीर व ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील घरासमोर समाज संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर १८ नोव्हेंबरला चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड.जांभुळे यांनी उपस्थित समाजबांधवांना दिली.याप्रसंगी रमेशकुमार गजबे, बळीराम गरमळे यांनीही मोर्चेकºयांना संबोधित केले. सभा आटोपल्यानंतर समाजाच्या १५ लोकांचे शिष्टमंडळ जात पडताळणी कार्यालयात पोहोचले व तेथे तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष सुरेश वानखेडे यांना निवेदन सादर केले. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी मागण्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळाला दिले. सभेदरम्यान समाजबांधवांनी नारेबाजी केली.सभेचे संचालन श्रीकांत धोटे यांनी तर प्रास्ताविक भाऊराव धारणे यांनी केले.मोर्चकऱ्यांच्या वाहनाने व्यापल्या खुल्या जागापूर्व विदर्भाच्या चार ते पाच जिल्ह्यातून मोर्चासाठी माना समाज बांधव गडचिरोली शहरात दाखल झाले. चंद्रपूर, चामोर्शी व आरमोरी या तिन्ही मार्गालगतच्या खुल्या परिसरात ठिकठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहने ठेवली होती. नगरभवनलगत चारचाकी वाहने असे ठेवण्यात आली होती.या आहेत मागण्यामाना समाजाच्या नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. प्रस्ताव खारीज करून परत केलेले आदेश पुनर्संचयीत करण्यात यावे. प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, आदी मागण्यांचा समिती कार्यालयाच्या सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात समावेश आहे.क्षणचित्रेइंदिरा गांधी चौकापासून आयटीआय चौकापर्यंत मोर्चा लांब होता.युवती व महिलांचीही प्रचंड उपस्थिती होती.मोर्चकºयांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला.मोर्चा आयटीआय चौकात पोहोचल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या मोर्चामुळे चंद्रपूर मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.२० हजारांवर लोक सहभागी असतानाही मोर्चा शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात होता.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमाती