शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वर्षावासनिमित्त धम्म प्रबाेधनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

भारत ही बुद्धाची भूमी असून बौद्ध धम्माची शिकवण मानवी कल्याणाची आहे. धम्माच्या नीतीमूल्याप्रमाणे दैनंदिन जीवन जगल्यास आपले कल्याण ...

भारत ही बुद्धाची भूमी असून बौद्ध धम्माची शिकवण मानवी कल्याणाची आहे. धम्माच्या नीतीमूल्याप्रमाणे दैनंदिन जीवन जगल्यास आपले कल्याण होईल, असे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी केले. गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व या विषयावर सी. पी. शेंडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सरचिटणीस तुलाराम राऊत यांनी परित्राणपाठ व बुध्दवंदना घेतली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले. कवडू उंदीरवाडे, बाळकृष्ण बांबोळे, हंसराज उंदीरवाडे यांनीही संबंधित विषयावर मार्गदर्शन केले. ही प्रवचन मालिका ऑक्टोबर महिना अश्विन पौर्णिमापर्यंत चालणार असून धम्मा संबंधीच्या विविध विषयावर बौद्धाचार्य,केंद्रीय शिक्षक प्रबोधन करणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस तुलाराम राऊत, प्रास्ताविक कार्यालयीन सचिव प्रा. गौतम डांगे तर आभार कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे यांनी मानले. यावेळी विशाखा महिला मंडळ, सम्यक समाज समिती,सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना खीर व फळदान करून सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.