शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

वर्षावासनिमित्त धम्म प्रबाेधनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

भारत ही बुद्धाची भूमी असून बौद्ध धम्माची शिकवण मानवी कल्याणाची आहे. धम्माच्या नीतीमूल्याप्रमाणे दैनंदिन जीवन जगल्यास आपले कल्याण ...

भारत ही बुद्धाची भूमी असून बौद्ध धम्माची शिकवण मानवी कल्याणाची आहे. धम्माच्या नीतीमूल्याप्रमाणे दैनंदिन जीवन जगल्यास आपले कल्याण होईल, असे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी केले. गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व या विषयावर सी. पी. शेंडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सरचिटणीस तुलाराम राऊत यांनी परित्राणपाठ व बुध्दवंदना घेतली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले. कवडू उंदीरवाडे, बाळकृष्ण बांबोळे, हंसराज उंदीरवाडे यांनीही संबंधित विषयावर मार्गदर्शन केले. ही प्रवचन मालिका ऑक्टोबर महिना अश्विन पौर्णिमापर्यंत चालणार असून धम्मा संबंधीच्या विविध विषयावर बौद्धाचार्य,केंद्रीय शिक्षक प्रबोधन करणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस तुलाराम राऊत, प्रास्ताविक कार्यालयीन सचिव प्रा. गौतम डांगे तर आभार कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे यांनी मानले. यावेळी विशाखा महिला मंडळ, सम्यक समाज समिती,सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना खीर व फळदान करून सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.