शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:54 IST

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देप्रशांत ठाकरे यांचे आवाहन : माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा; गडचिरोलीत सायबर पोलीस स्टेशन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या ‘सायबर गुन्हेगारी जाणीव जागृती’ कार्यशाळेत ते बोलत होते. गडचिरोली येथील पोलिसांची सायबर लॅब आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते.बँकेचे व्यवहार आॅनलाईन पध्दतीने करताना त्यात असणारी जोखीम, तसेच एटीएमचा वापर आणि त्याबाबत घ्यावयाची खबरदारी, यासोबतच दूरध्वनीवरुन बँक ग्राहकांची होणारी फसवणूक याबाबत ठाकरे यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाव्दारे सविस्तर विवेचन केले. व्हीशींग (टेलीफोनव्दारे फसविणे), फिशिंग (आॅनलाईन बनावट साईटव्दारे फसविणे), लॉटरी फ्रॉड, तसेच विवाहविषयक साईडव्दारे फसवणूक यापासून दूर कसे राहावे, याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. मोबाईल बँकींग करताना खुल्या वायफायच्या वापरात असणारे धोके नेमकेपणाने काय आहेत, त्याचप्रमाणे वन टाइम पिन आणि पासवर्डची सुरक्षितता याबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली.सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा व त्याबाबतच्या असणाºया महत्त्वाच्या तरतुदींबाबत पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या आरंभी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सहकार्य या कार्यशाळेस लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दैठणकर यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, स्वप्नील महल्ले यांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार उपस्थित होते.चार महिन्यांत सायबरचे केवळ दोन गुन्हेगडचिरोली सायबर लॅबच्या जोडीला आता सायबर पोलिस स्टेशनही सुरु झाले आहे. यात दाखल एका गुन्ह्यात शहरातील १३ जणांच्या एटीएमचा वापर करुन झालेली फसवणूक आणि त्या १५ लाख रुपयांच्या गुन्ह्यांचा घेतलेला तपास याचेही सादरीकरण राठोड यानी यावेळी केले. विशेष म्हणजे चार महिन्यांत सायबर पोलीस ठाण्यात केवळ दोन गुन्ह्याची नोंद झाली आहे.