शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:54 IST

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देप्रशांत ठाकरे यांचे आवाहन : माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा; गडचिरोलीत सायबर पोलीस स्टेशन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले.येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या ‘सायबर गुन्हेगारी जाणीव जागृती’ कार्यशाळेत ते बोलत होते. गडचिरोली येथील पोलिसांची सायबर लॅब आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते.बँकेचे व्यवहार आॅनलाईन पध्दतीने करताना त्यात असणारी जोखीम, तसेच एटीएमचा वापर आणि त्याबाबत घ्यावयाची खबरदारी, यासोबतच दूरध्वनीवरुन बँक ग्राहकांची होणारी फसवणूक याबाबत ठाकरे यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाव्दारे सविस्तर विवेचन केले. व्हीशींग (टेलीफोनव्दारे फसविणे), फिशिंग (आॅनलाईन बनावट साईटव्दारे फसविणे), लॉटरी फ्रॉड, तसेच विवाहविषयक साईडव्दारे फसवणूक यापासून दूर कसे राहावे, याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. मोबाईल बँकींग करताना खुल्या वायफायच्या वापरात असणारे धोके नेमकेपणाने काय आहेत, त्याचप्रमाणे वन टाइम पिन आणि पासवर्डची सुरक्षितता याबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली.सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा व त्याबाबतच्या असणाºया महत्त्वाच्या तरतुदींबाबत पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या आरंभी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सहकार्य या कार्यशाळेस लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दैठणकर यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, स्वप्नील महल्ले यांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार उपस्थित होते.चार महिन्यांत सायबरचे केवळ दोन गुन्हेगडचिरोली सायबर लॅबच्या जोडीला आता सायबर पोलिस स्टेशनही सुरु झाले आहे. यात दाखल एका गुन्ह्यात शहरातील १३ जणांच्या एटीएमचा वापर करुन झालेली फसवणूक आणि त्या १५ लाख रुपयांच्या गुन्ह्यांचा घेतलेला तपास याचेही सादरीकरण राठोड यानी यावेळी केले. विशेष म्हणजे चार महिन्यांत सायबर पोलीस ठाण्यात केवळ दोन गुन्ह्याची नोंद झाली आहे.