शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

अन्यायाविरोधात एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:31 IST

राज्य शासनाने सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून देण्याचे अभिवचन दिले होते. तब्बल एक वर्ष लोटूनही तो लागू केला नाही. यासोबतच शासनाने ३० टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासर्व निर्णयाविरूद्ध लढा देण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, ....

ठळक मुद्देउमेशचंद्र चिलबुले यांचे प्रतिपादन : अहेरी व एटापल्लीत कर्मचाऱ्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/एटापल्ली : राज्य शासनाने सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून देण्याचे अभिवचन दिले होते. तब्बल एक वर्ष लोटूनही तो लागू केला नाही. यासोबतच शासनाने ३० टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासर्व निर्णयाविरूद्ध लढा देण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी केले.मुंबई येथे २२ फेब्रुवारीला राज्यातील सर्व कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी शुक्रवार १९ जानेवारीला अहेरी व एटापल्ली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी ए.आर. वाघमारे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, सहसचिव दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमन गंजीवार, पांडुरंग पेशने उपस्थित होते.पुढे बोलताना चिलबुले म्हणाले, राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे, शासनाच्या तिजोरीवरील भार कमी करून कायदेशीर असलेला सातवा वेतन लागू करू, असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे. तर दुसरीकडे नोकर कपात करून कंत्राटी कर्मचारी पद भरती सुरु केली आहे. हा सुशिक्षित युवकांवर अन्याय आहे. त्यामुळे यासर्व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित यावे, असेही उमेशचंद्र चिलबुले म्हणाले. कार्यक्रमाला अहेरी व एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.