शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

भारतीय संविधानाच्या पाठीशी राहा

By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST

बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही.

गडचिरोली : बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही. ‘आम्ही भारताचे लोक’ या संविधानाच्या प्रास्ताविकेतच समानता भिनलेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधात सुरू असलेले षड्:यंत्र हाणून पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहा, असे रोखठोक आवाहन सुविख्यात साहित्यीक तथा विचारवंत प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. सांप्रदायिकता विरोधी कृती समिती गडचिरोलीच्यावतीने येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलादालनात आयोजित जातीय अत्याचार व सांप्रदायिकता विरोधी परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत जन आंदोलनांचे जिल्हा संयोजक माजी आमदार हिरामन वरखडे होते. मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. रूपा कुलकर्णी, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जिंदा भगत, मुस्लीम परिषदेचे नेते प्रा. जावेद पाशा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भगवान बिरसा मुंडा, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.पुढे बोलताना प्रा. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले,भारतीय संविधान हे मुल्यांचा व नैतिकतेचा कोष आहे. परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींवरच अलिकडे अन्याय व अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय नागरिकांनी आपल्या समस्यांच्या मुळाचा शोध घेतला पाहिजे, असेही प्रा. डॉ. मनोहर यावेळी म्हणाले.प्रा. डॉ. रूपा कुलकर्णी म्हणाल्या, सांप्रदायिकता हे विकृतीचे नाव आहे. जातीय व धार्मिक भांडणाचा चौकटीतल्या लोकांना धोका नाही. मनुस्मृती ग्रंथात शुद्र व अतिशुद्रांना कठोर शिक्षा सांगितल्या आहेत. शुद्रांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. आता काही माणसाच्या मनात ‘मनू’ आहे. माणसाच्या मनामनातला हा मनू नष्ट झाला पाहिजे. तेव्हाच बहुजनांवरील अन्याय, अत्याचार नष्ट होतील, असेही प्रा. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश कोपुलवार, संचालन जगदश मेश्राम यांनी केले तर आभार प्रभू राजगडकर यांनी मानले. यावेळी रोहिदास राऊत, जि.प. सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, प्रा. पंडीत फुलझेले, नासीन जुमन शेख, सुरेखा बारसागडे, जगन जांभुळकर आदीसह बहुसंख्य दलित, आदिवासी व अन्य नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)