शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
7
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
8
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
9
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
10
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
11
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
12
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
13
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
14
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
15
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
17
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
18
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
19
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

२१ लाखांची मदत के व्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:10 IST

सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देतालुकास्तरावर दिरंगाई : जिल्हाभरातील अनेक आपदग्रस्त प्रतिक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात तालुकास्तरावरून आपदग्रस्तांना मदतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्यापही २१ लाख २ हजार ३३५ रूपयांची मदत देणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.एप्रिल ते जुलैपर्यंत यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सहा इसमांचा मृत्यू झाला. यामध्ये कोरची तालुक्यातील एक व मुलचेरा तालुक्यातील पाच इसमांचा समावेश आहे. सदर मृतक इसमांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांप्रमाणे २४ लाख रूपयांची मदत प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.वीज पडून झालेल्या आपत्तीमुळे १८ इसम जखमी झाले. या १८ इसमांना एकूण १ लाख २ हजार ६०० रूपयांची मदत देण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, कोरची एक, देसाईगंज तीन, आरमोरी एक, चामोर्शी तीन, मुलचेरा सात, अहेरी तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. आपत्तीमुळे यंदा ३० लहान जनावरे दगावली. यामुळे १ लाख २३ हजार रूपयांचे संबंधित पशुपालकांचे नुकसान झाले. यापैकी प्रशासनामार्फत २४ जनावर मालकांना १ लाख ५ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अद्यापही सहा जनावर मालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.आपत्तीमुळे ४५ मोठी जनावरे दगावली. यामुळे १० लाख १७ हजार रूपयांचे नुकसान झाले. यापैकी २४ जनावर मालकांना ५ लाख १४ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अद्यापही २१ जनावरे मालक ५ लाख ३ हजार रूपये मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे जिल्हाभरात एकूण ५६९ घरांची अंशत: पडझड झाली. यामुळे १७ लाख ६९ हजार ५३२ रूपयांचे नुकसान झाले. यापैकी केवळ १०० आपदग्रस्तांना १ लाख ९२ हजार ४०० रूपयांची मदत देण्यात आली. अद्यापही ४६९ आपदग्रस्त १५ लाख ७७ हजार १३५ रूपयांच्या मदतीपासून वंचित आहेत.पावसामुळे दोन घरांची पूर्णत: पडझड झाली. यापैकी एकाला १८ हजार ५०० रूपयांची मदत देण्यात आली.पावसामुळे सात गोठ्यांची अंशत: पडझड झाली असून १२ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाले. यापैकी पाच नुकसानग्रस्तांना ८ हजार २०० रूपयांची मदत देण्यात आली. अद्यापही दोन आपदग्रस्त ४ हजार २०० मदतीपासून प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निधी वळता करण्यात आला आहे. मात्र दिरंगाई तालुकास्तरावरून होत आहे.अतिवृष्टीने ५४ लाख रूपयांचे नुकसानयावर्षीच्या पावसाळ्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. १८ नागरिक जखमी झाले. ३० लहान जनावरे, ४५ मोठे जनावरे मृत्यमुखी पडली. ५६९ घरांचे अंशत: व दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले. सात गुरांचे गोठे कोसळले. या सर्व बाबीमुळे नागरिकांचे २४ लाख ४३ हजार ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले. आपदग्रस्तांना आतापर्यंत ३३ लाख ४० हजार ७०० रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. तर २१ लाख २ हजार रूपयांची मदत अजूनही देण्यात आली नाही. यामध्ये जनावर मालक व घर कोसळलेल्या नागरिकांचा समावेश आहे. सदर मदत तत्काळ देण्याची मागणी आहे.