शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
2
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
3
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
4
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
5
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
6
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
7
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
8
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
9
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
10
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
11
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
12
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
14
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
15
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
16
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
17
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
18
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
19
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
20
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी कटिबद्ध होऊ या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:27 IST

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.यावेळी आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी अशोकचौधरी, प्रकल्प अधिकारी पठारे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी आ.कृष्णा गजबे म्हणाले की, गडचिरोली संवाद या चर्चासत्रात विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यात सकारात्मक विचार मंथन होवून विकासाचा प्रारुप आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. त्यासोबत प्रशासनानी जिल्ह्यातील १२ तालुक्यातील पदाधिकारी व अधिकारी यांची स्वतंत्र बैठक बोलावून तेथील भौगोलिक, पारंपरिक परिस्थितीचा विचारविनीमय करुन एक आराखडा तयार केल्यास आपणास विकासाच्या योजना राबविण्यास निश्चित मदत होणार आहे. आजच्या स्थितीत शासकीय योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधीचे समन्वय असून सर्व या विकास प्रक्रियेसाठी कटिबध्द असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.भारत सरकारच्या वन धन योजनेअंतर्गत ही एक संकल्पना समजून गौन वनउपज वनात राहणाऱ्या वनवासीना अधिक लाभाचे ठरेल अशी योजना आखावी. आणि कोणत्याही योजना कागदावरच न राहता त्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत याव्यात अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केली. सर्व विभागांनी डेटा सादर करताना १०० टक्के सत्यतापूर्वक सादर केला पाहिजे. त्यामुळे आपणास पुढील योजनांची आखणी करताना चुका संभवणार नाही. दिलेल्या निर्देशांकाच्या व्यतिरिक्त गौण उपजावरील उद्योगावर भर दिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्यामुळे वनावर आधारीत सर्व बांबीचासुध्दा यामध्ये समावेश करावा असे सामाजिक सेवा संस्थाच्या प्रतिनिधीकडून मत व्यक्त झाले आहे. याबाबीचासुध्दा आपणास विचार करावयाचा आहे. आतापर्यंत झालेल्या विचार मंथनातून निघालेल्या निष्कर्षाचा विचार केल्यास आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे. तेव्हा सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यास जिल्हा समृध्द करण्यास काही अडचणी येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.तत्पूर्वी शनिवारी झालेल्या संवाद सत्रातील विचार मंथनावर विचार विनिमय करण्यात आले. आणि गटनिहाय प्रश्न उत्तरांची नोंद टिपण्यात आली. या समोरोपीय कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराभाई हिरालाल, देवाजी तोफा, सृष्टी या संस्थेचे केशव गुरनूले, अहेरीचे अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, डॉ.प्रकाश पवार, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले तर, आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी केले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीcollectorजिल्हाधिकारी