शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

सावधान ! सिराेंचा तालुक्यात डेंग्यूची सर्वाधिक रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

गडचिराेली : जिल्ह्यात चिकुनगुनिया व काविळचे रुग्ण आढळून आले नसून त्याची साथही नाही; मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ...

गडचिराेली : जिल्ह्यात चिकुनगुनिया व काविळचे रुग्ण आढळून आले नसून त्याची साथही नाही; मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ३६ रुग्ण आढळून आले. यापैकी दाेन रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. ते रुग्ण तपासणी व औषधाेपचारासाठी गडचिराेली जिल्ह्यात आल्याने त्यांची नाेंद करण्यात आली.

डेंग्यू व चिकुनगुनिया हे कीटकजन्य आजार आहे. तर कावीळ हा पाण्यापासून हाेणारा जलजन्य आजार आहे. हे तीनही आजार गंभीर आहेत. वेळीच याेग्य औषधाेपचार न मिळाल्यास प्रसंगी रुग्णांचा जीवही जाताे. आराेग्य विभागाच्या वतीने यासंदर्भात जनजागृती करून औषधाेपचार मिळाल्याने आढळून आलेल्या सर्वच रुग्णांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे. काही रुग्ण अजूनही घरी राहून गाेळ्या खात आहेत. अशाप्रकारचे आजार हाेऊ नयेत, यासाठी लहान मुला-मुलींसह सर्वांनीच स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

बाॅक्स....

चिकुन गुनिया व काविळचा रुग्ण नाही

गडचिराेली जिल्ह्यात गेल्या एक ते दाेन महिन्यात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही. तसेच काविळ रुग्णाच्या बाबतीतही जिल्हा निरंक आहे. या दाेन्ही रुग्णांची जिल्ह्यात कुठेही साथही नाही, अशी माहिती आराेग्य विभागाकडून मिळाली आहे.

...........

लहान मुलांनाही झाली हाेती डेंग्यूची बाधा

- एक ते दीड महिन्यापासून गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात व्हायरल तापाची साथ आहे. सर्दी, खाेकला, तापाने अनेक बालक ग्रस्त हाेते.

- १५ ते २० दिवसांपूर्वी काही लहान बालकही डेंग्यूग्रस्त आढळून आले हाेते. त्यांच्यावर उपचार झाले.

.............

काय आहेत लक्षणे ?

डेंग्यू : एडीस डासाच्या मादीने दंश केल्यावर ३ ते १४ दिवसांच्या आत डेंग्यूची लक्षणे दिसून येतात. यामध्ये ताप, तीव्र डाेकेदुखी, डाेळ्यांचे मागे वेदना, मळमट, उलटी.

चिकुनगुनिया : ताप येणे, पाय, गुडघा, मनगट व हाताला तीव्र वेदना हाेतात. तीव्र पाठदुखी, डाेळ्यांना वेदना हाेतात. याशिवाय स्नायू व सांध्यावर सूज येते.

कावीळ : डाेळे, त्वचा, नखे पिवळ्या रंगाची हाेणे, भूक मंदावणे, मळमळ वाटणे, उलट्या हाेणे, त्वचेला खाज सुटणे, ताप येणे, अंग माेडून जाणे, पाेटामध्ये वेदना हाेणे व लघवी पिवळी जर्द आणि गडद हाेणे आदी लक्षणे आहेत.

काेट...

गडचिराेली जिल्ह्यातील सहा तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण यापूर्वी आढळून आले. सर्व रुग्णांवर औषधाेपचार सुरू असून दवाखान्यातून ते घरी गेले आहेत. ते पूर्णत: बरे झाले नसले तरी त्यांची प्रकृती आता धाेक्याबाहेर आहे. आमच्या विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले.

- डाॅ.कुणाल माेडक, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिराेली