शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत समस्या सुटल्या नाहीत

By admin | Updated: December 6, 2014 22:49 IST

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेले हळदवाही टोला हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी

प्रवीण खेडकर - भाडभिडीचामोर्शी तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेले हळदवाही टोला हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावाच्या विकासाकडे नवीन सरकारच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी आशा येथील नागरिक बाळगुण आहेत. गावात वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा असणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात स्मशानभूमी, आकर, ढोरफोडी या सुविधाही असणे गरजेचे असते. मात्र हळदवाहीटोला या गावाला या सोयीसुविधा अद्यापही मिळाल्या नव्हत्या. गावात या सुविधा नसणे हीच समस्या गावात निर्माण झाली आहे. गाव अद्यापही एका हक्काच्या नावापासून वंचित आहे. एखाद्या गावाजवळ ५-१० घराची नवीन वस्ती म्हणजे टोली, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र हळदवाहीटोला हे नाव हळदवाही गावाजवळ असल्याने पडलेले आहे. विशेष म्हणजे हळदवाही व हळदवाहीटोला या दोनही गावची लोकसंख्या सारखीच आहे. हळदवाही टोलात ६०० च्यावर नागरिक राहतात. गावात २०० च्या आसपास कुटुंब वास्तव्यास आहे. १७७.७८ हेक्टरवर गाव वसले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गावास टोला म्हणणे अडचणीचे व अयोग्य वाटत असल्याने २००८ रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. यावेळी मात्र सदर प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला ७०० च्यावर पशुधन गावात आहेत. मात्र गावात आकर, ढोरफोडी, स्मशानभूमी नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र ५० टक्के शेतकऱ्यांनाच कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते. उर्वरित शेती कोरडवाहू आहे. गावालगतच आठ महिने वाहणारा नाला आहे. या नाल्यावर बंधारा बांधून शेतीला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या प्रतिनिधींनी लक्ष द्यावे.