शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

बँकांनी नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:52 IST

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ करावी, तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : साखरा येथे कृषी कल्याण अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ करावी, तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांतील शासकीय खाती बंद करण्यात येऊ नये, इतर बँकांत वर्ग करण्यात येतील. त्यामुळे बँकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत कृषी कल्याण अभियानाची मोहीम १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सुरू आहे. साखरा येथे प्रशिक्षण वर्गास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, साखराचे सरपंच तुकाराम अंबादे, ग्रा. पं. सदस्य सीता गेडाम, दर्शना खंडारे, प्रभा गेडाम, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कऱ्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. तारू, डॉ. कदम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे, हेमके उपस्थित होते.बळीराजा सेंद्रीय गटाचे प्रवर्तक नामदेव उंदीरवाडे यांनी गोप्स ब्राँडच्या तांदळाचे पॅकिंग देऊन जिल्हाधिकाऱ्यांची स्वागत केले. डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी असलेल्या कृषी पूरक योजनांची माहिती दिली. मधुमक्षिका पालन, अळींबी उत्पादन यासह विविध माहिती असलेल्या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच भाजीपाला बियाणे तूर मिनीकीट, जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप जिल्हाधिकाºयांच्या हस्ते करण्यात आले.