शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कर्मचाऱ्यांअभावी एटापल्लीतील बँक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:50 IST

स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही.

ठळक मुद्देस्टेट बँकेतील प्रकार : शाखा व्यवस्थापकाने बँकेच्या मुख्य दरवाजाला लावले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही. सोमवारी कार्यरत कर्मचाºयांपैैकी दोन कर्मचारी सुटीवर तर एक कर्मचारी रोकड आणायसाठी गेले. कॅश कॉऊंटरवर एकही कर्मचारी नसल्याने अखेर शाखा व्यवस्थापक योगेश दत्त यांनी चक्क बँकेचा मुख्य दरवाजाला कुलूप लावले. बँक बंद असल्याने ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.दुपारच्या सुमारास नगर पंचायतीचे पाणी पुरवठा सभापती जितेंद्र टिकले व बांधकाम सभापती किसन हिचामी यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकासोबत चर्चा केली. त्यानंतर बँक उघडण्यात आली. मात्र बँकेच्या दरवाजाला कुलूप असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत या बँक शाखेतील आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प होते. २५ मे १९७८ मध्ये तालुक्यात कुठलीही बँक नसताना एटापल्ली येथे स्टेट बँक आॅफ इंडिया ही एकमेव शाखा सुरू करण्यात आली. सदर राष्ट्रीयकृत बँक शाखेला आजघडीस ४० हून अधिक वर्ष उलटले आहेत. एटापल्ली तालुक्यात ही बँक शाखा वगळता इतर कोणतीही दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही. सदर बँकेचे २५ हजारवर खातेदार असून दररोज ४० ते ५० लाख रूपयांची उलाढाल होत असते. तसेच ५५ कोटी पेक्षा अधिक रक्कम या बँक शाखेत खातेदारांची जमा आहे. येथील कार्यरत कर्मचारी प्रामाणिक सेवा देत आहेत. मात्र रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचारीही हतबल झाले आहेत.या बँक शाखेतील विविध समस्यांची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार दिल्या जाते. परंतु एकही समस्या मार्गी लावली जात नसल्याची खंडत येथील शाखा व्यवस्थापकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. प्रस्तूत प्रतिनिधीने याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व ठाणेदार जगताप यांना दिली. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा करू, असे सांगितले. बँक बंद असल्याने ग्राहकांना फटका बसला.