शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधीचा रस काढण्यास वैरागड येथे बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:48 IST

सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे.

ठळक मुद्देवैरागड ग्रामसभेत ठराव : अल्पावधीतच झाड होते नष्ट, कारवाईचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान ग्रामसभेसमोर आहे.वैरागड परिसरातील मेंढा, वडेगाव, कुरंडीमाल, येंगाडा, पिसेवडधा, सुकाळा, मोहझरी या गावांमधील शेतांमध्ये, बोडी, तलावाच्या पाळीवर तसेच जंगलात मोठ्या प्रमाणात सिंधीची झाडे आहेत. सिंधीच्या झाडाची पूर्णपणे वाढ होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेली शेकडो झाडे वैरागड परिसरात आहेत. त्यामुळे येथील सिंधीची झाडे वैरागड परिसरासाठी भुषणावह बाब ठरली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून हिवाळाच्या कालावधीत सिंधीच्या झाडाचा रस काढण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यासाठी बाहेरगावचे नागरिक येतात. ते शेतमालकाला काही पैसे देतात. मात्र रस काढण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे. यामुळे झाडाला बाधा निर्माण होत असल्याने त्यावर कारवाई करण्याचे अधिकार वन विभागाला सुध्दा आहेत. परंतू वनविभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सिंधीचा रस काढण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.सिंधीच्या झाडाचे रस काढताना फांद्या तोडल्या जातात. तसेच खिळा ठोकून झाडाला जखम केली जाते. नळी टाकून रस काढला जात असल्याने त्या झाडाचे जीवनसत्व संपून झाडाच्या वरचा पालवीचा बुंदा कोसळून सदर झाड काही वर्षातच करपत जात आहेत. वैरागड परिसरातील गावांमधील शेकडो सिंधीची झाडे करपली आहेत. लोकमतने याबाबत मार्च २०१८ मध्ये वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीचा रस काढण्यावर बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. मात्र या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सिंधी काढण्यासाठी दुसऱ्या गावातील व्यावसायिक दाखल झाले आहेत.रसात मिसळविली जातात घातक रसायनेसिंधीच्या रसामध्ये घातक रसायने मिसळविली जातात. या रसाची तपासणी करून संबंधित विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करू शकतात. तसेच सिंधीच्या रसामुळे नशा येत असल्याने पोलीस विभाग सुध्दा संबंधित विक्रेत्यावर कारवाई करू शकते. मात्र या दोन्ही विभागांसह वनविभागही चूप असून वैरागडसह जिल्हाभरात खुलेआम सिंधीच्या रसाची विक्री केली जात आहे.