शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

सिंधीचा रस काढण्यास वैरागड येथे बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:48 IST

सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे.

ठळक मुद्देवैरागड ग्रामसभेत ठराव : अल्पावधीतच झाड होते नष्ट, कारवाईचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान ग्रामसभेसमोर आहे.वैरागड परिसरातील मेंढा, वडेगाव, कुरंडीमाल, येंगाडा, पिसेवडधा, सुकाळा, मोहझरी या गावांमधील शेतांमध्ये, बोडी, तलावाच्या पाळीवर तसेच जंगलात मोठ्या प्रमाणात सिंधीची झाडे आहेत. सिंधीच्या झाडाची पूर्णपणे वाढ होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेली शेकडो झाडे वैरागड परिसरात आहेत. त्यामुळे येथील सिंधीची झाडे वैरागड परिसरासाठी भुषणावह बाब ठरली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून हिवाळाच्या कालावधीत सिंधीच्या झाडाचा रस काढण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यासाठी बाहेरगावचे नागरिक येतात. ते शेतमालकाला काही पैसे देतात. मात्र रस काढण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे. यामुळे झाडाला बाधा निर्माण होत असल्याने त्यावर कारवाई करण्याचे अधिकार वन विभागाला सुध्दा आहेत. परंतू वनविभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सिंधीचा रस काढण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.सिंधीच्या झाडाचे रस काढताना फांद्या तोडल्या जातात. तसेच खिळा ठोकून झाडाला जखम केली जाते. नळी टाकून रस काढला जात असल्याने त्या झाडाचे जीवनसत्व संपून झाडाच्या वरचा पालवीचा बुंदा कोसळून सदर झाड काही वर्षातच करपत जात आहेत. वैरागड परिसरातील गावांमधील शेकडो सिंधीची झाडे करपली आहेत. लोकमतने याबाबत मार्च २०१८ मध्ये वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीचा रस काढण्यावर बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. मात्र या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सिंधी काढण्यासाठी दुसऱ्या गावातील व्यावसायिक दाखल झाले आहेत.रसात मिसळविली जातात घातक रसायनेसिंधीच्या रसामध्ये घातक रसायने मिसळविली जातात. या रसाची तपासणी करून संबंधित विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करू शकतात. तसेच सिंधीच्या रसामुळे नशा येत असल्याने पोलीस विभाग सुध्दा संबंधित विक्रेत्यावर कारवाई करू शकते. मात्र या दोन्ही विभागांसह वनविभागही चूप असून वैरागडसह जिल्हाभरात खुलेआम सिंधीच्या रसाची विक्री केली जात आहे.