शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नक्षलग्रस्त भागात बॅलेट सज्ज

By admin | Updated: April 23, 2015 01:21 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी उपविभागात २४ एप्रिल रोजी अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यात ग्रामपंचायत ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी उपविभागात २४ एप्रिल रोजी अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी बेसकॅम्पवर रवाना झाल्या आहेत. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व अहेरी या चार नक्षलप्रभावीत तालुक्यांमध्ये २४ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. या चार तालुक्यांमधील ७० ग्राम पंचायतींपैकी १४ ग्राम पंचायतींमध्ये नक्षल्यांच्या भीतीने नागरिकांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. उर्वरित ५६ ग्राम पंचायतींमध्ये एक हजार ३०५ उमेदवार रिंगणात आहेत. अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतील ७२ प्रभागासाठी १८१ सदस्य निवडावयाचे आहेत. २१ ग्रामपंचायतीत ५० हजार ६८० मतदार आहेत. यात २४ हजार ७९५ पुरूष तर २४ हजार ७८५ स्त्री मदतार आहेत. अहेरी तालुक्यात एकूण ५२२ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र झाले. सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८३ मतदान केंद्र असून यासाठी ९० ईव्हीएम मशीनची गरज आहे आणि १० टक्के ईव्हीएम मशीन आरक्षित ठेवण्यात येणार आहे. जवळपास १५० बॅलेट युनिट उपलब्ध आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक केंद्र अधिकारी, तीन मतदान अधिकारी कार्यरत राहणार आहे. अतिरिक्त १० टक्के कर्मचारी आरक्षित आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ३६० ते ३७० कर्मचारी कर्तव्यावर राहतील. तालुक्यात ८३ मतदान केंद्रापैकी आठ मतदान केंद्र अतिसंवेदनशिल आहे. त्यात येलचील, चिंतलपेठ, तिमरन, गुड्डीगुडम, मेडपल्ली, कोरेली बु., चंद्रा, गोविंदगाव यांचा समावेश आहे आणि ४८ मतदान केंद्र संवेदनशिल आहे. २७ मतदान केंद्र साधारण आहे. या तालुक्यात चार बेस कॅम्पही तयार करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी, जिमलगट्टा, राजाराम, पेरमिली यांचा समावेश आहे. येथूनच पोलिंग पार्ट्या पुढे पाठविल्या जाणार आहे. एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, उडेरा, गेदा, गुरूपल्ली, येमली, सोहगाव, जारावंडी, बुर्गी, दिवडी या नऊ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या नऊ ग्राम पंचायतींमध्ये नऊ हजार ८१२ स्त्री तर १० हजार २६८ पुरूष मतदार आहेत. या सर्वच ग्राम पंचायती नक्षलप्रभावी क्षेत्रामध्ये मोडतात.एका ग्राम पंचायतीमध्ये पाच ते सहा गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावाचे अंतर चार ते पाच किमी आहे. नागरिकांना एवढ्या दूर अंतर चालत येऊन मतदान करण्याची पाळी येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने गावनिहाय ३६ मतदान केंद्र निर्माण केले आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या तालुक्यातही कडेकोट पोलीस बंदोबस्त मतदानादरम्यान राहणार आहे. बेस कॅम्पवरून पोलिंग पार्ट्या बुधवारी रवाना करण्याचे काम सुरू करण्यात आले.सिरोंचा तालुक्यात मुख्यालयाच्या ग्रामपंचायतसह अन्य २४ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिंग पार्ट्यांना साहित्याचे वाटप करून बेसकॅम्पकडे रवाना करण्यात आले आहे. येथेही नक्षलप्रभावित भागात मतदान असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पार्ट्याही बंदोबस्ता रवाना होतील. (जिल्हा प्रतिनिधी)