शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जिल्हा बँंकेतर्फे बलकोवा बांबू व शमी झाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:19 IST

दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देविक्री व्यवस्था निर्माण करणार : सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते प्रा.शेषराव येलेकर, अरूण मुनघाटे, रवींद्र म्हशाखेत्री, दादाजी राऊत, हेमंत खुणे, मदन मेश्राम, व.रा.वडपल्लीवार यांना शमी व बलकोवा बांबूचे झाड देण्यात आले.याप्रसंगी गडचिरोली नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. बँकेच्या साधारण सभेसाठी उपस्थित झालेल्या जिल्ह्यातील ३०० च्या वर संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना बलकोवा बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. बांबू विक्रीबाबत संबंधित कंपनीशी चर्चा करून सामजस्य करार करण्यात येईल. बांबू विक्रीची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती अरविंद पोरेड्डीवार यांनी यावेळी दिली. बलकोवा (भीमा) बांबू हा तीन वर्षात ३० फुटापर्यंत वाढतो. या बांबूची शेतकºयांनी पडिक जमीन व शेतीच्या बांधावर लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, त्यादृष्टिकोनातून जिल्हा बँक कर्ज पुरवठा करण्याच्या विचारात आहे, असेही पोरेड्डीवार म्हणाले.दसऱ्याला पूजा, गणपतीलाही प्रियशमी झाडाचे पाने गणपतीला वाहतात. तेलंगणा राज्यात दसºयाला ही पाने पूजेसाठी उपयोगात आणतात. सुमारे ३०० वर्षापूर्वी जोधपूरचे राजे अभयसिंग यांचे प्रतिनिधी शमीच्या झाडाच्या कत्तलीसाठी गेले असता, विष्णोई समाजातील अमृतादेवी नावाच्या मुलीने शमीच्या झाडाची कत्तल करू नका, असे म्हणत झाडाला घट्ट बिलगली. परंतु राज्याच्या सैनिकांनी तिचे शिर धडावेगळे करून शमी झाडाची कत्तल करू लागले. त्यावेळी जवळपास ८४ गावातील विष्णोई समाजातील पुरूष व महिलांनी एकत्र येऊन वृक्ष तोडण्यास मनाई करू लागले. ही गोष्ट राजे अभयसिंग यांना माहित होताच ते स्वत: विष्णोई समाजाची माफी मागून शमीच्या झाडासोबतच इतरही झाडांचे संवर्धन करण्याचे वचन दिले, अशी शमी झाडाबद्दल आख्यायीका आहे, असे अरविंद पोरेड्डीवार यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण संतुलन साधण्याचे काम विष्णोई समाजातील लोकांद्वारे करण्यात आले, असेही पोरेड्डीवार म्हणाले.

टॅग्स :bankबँक