शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुरमाड जागेवर बहरली गर्द वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर दिला जात आहे. तालुक्यातीलच डोंगरमेंढा येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाची केंद्र  शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे.

पुरूषाेत्तम भागडकरलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वडसा वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांच्या पुढाकारात वन विभागाने शासकीय जागेवरील  अतिक्रमण हटवून वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. ओसाड जागेवर माेठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संरक्षण व संवर्धनावर जोर दिल्याने देसाईगंज तालुक्यात वनराई बहरू लागली आहे. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर दिला जात आहे. तालुक्यातीलच डोंगरमेंढा येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाची केंद्र  शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे. तर एकलपूर, कसारी, पिंपळगाव (ह.), शिवराजपूर या गावांना जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/रिठ येथील वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी व भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत मिळेल.पर्यायी मिश्र रोपवनांतर्गत माती परीक्षण करून त्या जागेवर तग धरू शकणारीच विविध प्रजातींची झाडे लावण्यात आल्याने सदर जागेवर वनराई बहरविण्यात वन विभागाला यश आले आहे. यासाठी नुकतेच निवृत्त झालेले सहायक उपविभागीय वनसंरक्षक व्ही.बी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. नुकतेच वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे यांचे स्थानांतरण झाले आहे. त्यांचे जागी येणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनीही अशीच मौलिक भूमिका बजावावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

२० हेक्टरवर आहेत २२ हजार २२० झाडेअनेकांनी अतिक्रमण केलेली २० हेक्टर शासकीय जागा वन विभागाने मोकळी केली. संपूर्ण जागा कुंपणाखाली आणून एकूण २० हेक्टर जागेत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतग॔त २२ हजार २२० वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण व संवर्धन शिवराजपूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुरू केल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष बाब अशी की यासाठी हेक्टरी १ हजार १११ रोपे लावण्यात आली. प्रत्येक रोपातील अंतर ३ बाय ३ मीटर ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे सर्वच राेपे जिवंत आहेत. मुरमाड जागेवर वृक्ष लागवड करून वनराई फुलविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे काैतुकही केले जात आहे. 

 

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग