शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

विदर्भातील नोकऱ्यांचा बॅकलॉग दोन लाखांवर

By admin | Updated: September 23, 2016 01:39 IST

नागपूर करारानुसार २३ टक्के नोकऱ्यात विदर्भाचा वाटा असताना २.५ टक्क्यांच्यावर विदर्भातील युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत.

स्वतंत्र राज्य द्या : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहितीकोरेगाव/चोप : नागपूर करारानुसार २३ टक्के नोकऱ्यात विदर्भाचा वाटा असताना २.५ टक्क्यांच्यावर विदर्भातील युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे विदर्भातील नोकऱ्यांचा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. हा बॅकलॉग दूर होण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे काळाची गरज असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवक आघाडी जिल्हा समन्वयक गौरव नागपूरकर यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र राज्याची बेताची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला बोजा याचा फटका मंत्रालयासह राज्यातील सरकारी सेवेला बसत आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी ते शिपाई अशी १ हजार २०७ पदे गेल्या वर्षापासून रिक्त आहे. राज्यभरात तब्बल ९० हजार पद रिक्त आहे. विशेष म्हणजे तिजोरीतील खळखळाटामुळे ही पदे न भरण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. एकूण महसुलापैकी ७० टक्के महसूल राज्याच्या आस्थापनेवर खर्च होत आहे. वाढीव पद भरण्याच्या मुद्यावर वर्षापूर्वी सरकारने आढावा घेतला होता. राज्याच्या अर्थमंत्री पदाची धूरा जयंत पाटील यांच्याकडे असताना त्यांनी आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका काढली होती. त्यानंतर सरकारी महामंडळ तसेच सरकारी आस्थापनेवर होणारा वाढीव खर्च यावर समिती नेमण्यात आली होती. या समितीने आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली महामंडळे बंद करावीत आणि अनावश्यक वाढीव पद रद्द करावीत, अशी शिफारशी केल्या. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची वाढीव पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे तरूणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील युवकांना नोकरी मिळण्यासाठी स्वतंत्र विदर्भ होणे अत्यंत आवााश्यक आहे असे नागपूरकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)