शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

लोकप्रतिनिधी भांडवलदारांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:44 IST

बहुजन आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले जाणारे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. ते भांडवलदारांच्या पाठीशी जात असल्यामुळे बहुजनवादी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल, ....

ठळक मुद्देजयंत पाटील यांचा आपोप : शेकाप करणार बहुजनवादी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहुजन आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले जाणारे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. ते भांडवलदारांच्या पाठीशी जात असल्यामुळे बहुजनवादी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.येथील इंदिरा गांधी चौकात पक्षाच्या निर्धार मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते अ‍ॅड.राजेंद्र कोरडे, मिलींद कांबळे, जयश्री वेळदा, रामदास जराते आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, सध्या देशात आणिबाणीपेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी सर्व पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. ज्या ठिकाणी उच्च-निच अशी दरी निर्माण होते तिथे आमचा लाल बावटा पोहोचतो. एक वेळ शेकापला संधी द्या, आम्ही चित्र बदलून टाकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. राज्यात शेतमालाला हमीभाव देण्याची सुरूवात आपल्याच पक्षाच्या मागणीवरून झाली. एन.डी.पाटील सहकारमंत्री असताना कापूस एकाधिकार योजना आपल्याच पक्षामुळे लागू झाली. एवढेच नाही तर शेतकºयांना कृषी कर्जवाटपाची सुरूवातही आपल्याच पक्षामुळे झाल्याचे पाटील म्हणाले.या मेळाव्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या नावावर येणारा पैसा कागदावर खर्च होतो. नोकरशाहीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा दबाव नाही, असाही आरोप त्यांनी केला.मेळाव्याच्या सुरूवातीला रामदास जराते यांनी आपल्या प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका मांडली. मेळाव्याचे संचालन जयंत निमगडे यांनी तर आभार सुधाकर आभारे यांनी व्यक्त केले.नक्षलवाद हा पर्याय नाहीआदिवासींवर वर्षानुवर्षे होत असलेल्या अन्यायामधून येथे नक्षलवाद फोफावला. पण हिंसेचा अवलंब करणारा नक्षलवाद त्यावर पर्याय ठरू शकत नाही, असे आ.पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. आम्ही अहिंसेच्या मार्गाने लढणारे, चळवळ उभी करणारे आणि ती यशस्वी करणारे आहोत, असे ते पुढे म्हणाले.काँग्रेसला मार्केटिंग जमत नाहीयुपीए सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले आहेत. आज प्रकल्पग्रस्तांना चार पट मोबदला दिला जात आहे. तो निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींनी तत्कालीन युपीए सरकारला बाध्य केले होते. पण काँग्रेसला अशा चांगल्या कामांचे मार्केटिंग करणे जमत नाही, अशी खंत आ.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ आहेत. आर्थिक निती ठरविण्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांची समिती केली होती. त्यांच्याशी नियमित चर्चा होत असे. मात्र आज मोदी आणि शहा हेच अर्थनिती ठरवतात, अशी टिका त्यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील