शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

घरकूल कामात जिल्हा माघारला

By admin | Updated: March 1, 2016 00:51 IST

गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली.

यंदा दीड हजार घरकुलांचे काम सुरू : गतवर्षीचे ५ हजार ५३२ घरकूल अपूर्णगडचिरोली : गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली. मात्र सूस्त प्रशासन व लाभार्थ्यांची प्रचंड अनास्था या दोन्ही कारणामुळे गडचिरोली जिल्हा घरकूल कामात महाराष्ट्रात प्रचंड माघारला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गतवर्षी मंजूर करण्यात आलेले ५ हजार ५३२ घरकूल अद्यापही अपूर्ण आहेत. तर चालू वर्षात मंजूर झालेल्या केवळ दीड हजार घरकुलाचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ या चालू वर्षात गडचिरोली जिल्ह्याला एकूण ७ हजार ७९४ घरकुलाचे उद्दीष्ट देण्यात आले असून तेवढेच घरकूल मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २ हजार १५६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. यातील जवळपास दीड हजार लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम हाती घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तिसऱ्या हप्त्याचे अनुदान प्राप्त होऊनही ६०० वर लाभार्थ्यांनी बांधकाम साहित्याच्या तुटवड्यामुळे घरकुलाच्या कामाला सुरूवात केली नाही. चालू वर्षात पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये अहेरी तालुक्यातील ३१८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यात १४३, भामरागड ८२, देसाईगंज ५५, धानोरा २४७, एटापल्ली ६३, गडचिरोली ४१३, कोरची २१५, कुरखेडा ३०६, मुलचेरा १३७ व सिरोंचा तालुक्यातील १७७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले आहे. अद्यापही ३ हजार ३६८ लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम सुरू करण्यात आले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)'१५९ घरकुलांचा शुभारंभच नाहीइंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१४-१५ या वर्षात एकूण ७ हजार ७९४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यापैकी १५९ घरकुलाच्या कामाला १० महिन्यानंतरही सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात घरकूल योजनेची अंमलबजावणी प्रचंड संथगतीने होत असल्याचे दिसून येत आहे. सुरूवात न झालेल्या घरकुलांमध्ये अहेरी तालुक्यातील १२१, चामोर्शी ३३, धानोरा ३ व सिरोंचा तालुक्यातील २ घरकुलांचा समावेश आहे.पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्षगेल्या सात-आठ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याला शासनाकडून घरकूल बांधकामाचे मोठ्या प्रमाणात उद्दीष्ट दिले जात आहे. मात्र अनुदानाची रक्कम मिळूनही जिल्ह्यातील लाभार्थी घरकूल बांधकामात दिरंगाई करीत आहे. पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी व कर्मचारी संबंधित गावांमध्ये दौरा करून लाभार्थ्यांना बांधकामासाठी प्रोत्साहित करीत नाही. याशिवाय लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत नाही. पंचायत समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व सूस्त कारभारामुळे घरकूल योजनेची गती प्रचंड मंदावली आहे.