शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

घरकूल कामात जिल्हा माघारला

By admin | Updated: March 1, 2016 00:51 IST

गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली.

यंदा दीड हजार घरकुलांचे काम सुरू : गतवर्षीचे ५ हजार ५३२ घरकूल अपूर्णगडचिरोली : गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली. मात्र सूस्त प्रशासन व लाभार्थ्यांची प्रचंड अनास्था या दोन्ही कारणामुळे गडचिरोली जिल्हा घरकूल कामात महाराष्ट्रात प्रचंड माघारला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गतवर्षी मंजूर करण्यात आलेले ५ हजार ५३२ घरकूल अद्यापही अपूर्ण आहेत. तर चालू वर्षात मंजूर झालेल्या केवळ दीड हजार घरकुलाचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ या चालू वर्षात गडचिरोली जिल्ह्याला एकूण ७ हजार ७९४ घरकुलाचे उद्दीष्ट देण्यात आले असून तेवढेच घरकूल मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २ हजार १५६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. यातील जवळपास दीड हजार लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम हाती घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तिसऱ्या हप्त्याचे अनुदान प्राप्त होऊनही ६०० वर लाभार्थ्यांनी बांधकाम साहित्याच्या तुटवड्यामुळे घरकुलाच्या कामाला सुरूवात केली नाही. चालू वर्षात पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये अहेरी तालुक्यातील ३१८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यात १४३, भामरागड ८२, देसाईगंज ५५, धानोरा २४७, एटापल्ली ६३, गडचिरोली ४१३, कोरची २१५, कुरखेडा ३०६, मुलचेरा १३७ व सिरोंचा तालुक्यातील १७७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले आहे. अद्यापही ३ हजार ३६८ लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम सुरू करण्यात आले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)'१५९ घरकुलांचा शुभारंभच नाहीइंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१४-१५ या वर्षात एकूण ७ हजार ७९४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यापैकी १५९ घरकुलाच्या कामाला १० महिन्यानंतरही सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात घरकूल योजनेची अंमलबजावणी प्रचंड संथगतीने होत असल्याचे दिसून येत आहे. सुरूवात न झालेल्या घरकुलांमध्ये अहेरी तालुक्यातील १२१, चामोर्शी ३३, धानोरा ३ व सिरोंचा तालुक्यातील २ घरकुलांचा समावेश आहे.पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्षगेल्या सात-आठ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याला शासनाकडून घरकूल बांधकामाचे मोठ्या प्रमाणात उद्दीष्ट दिले जात आहे. मात्र अनुदानाची रक्कम मिळूनही जिल्ह्यातील लाभार्थी घरकूल बांधकामात दिरंगाई करीत आहे. पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी व कर्मचारी संबंधित गावांमध्ये दौरा करून लाभार्थ्यांना बांधकामासाठी प्रोत्साहित करीत नाही. याशिवाय लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत नाही. पंचायत समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व सूस्त कारभारामुळे घरकूल योजनेची गती प्रचंड मंदावली आहे.